AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिमाचलमधलं एक असं गाव जेथे दिवाळी साजरी होत नाही, घरात कोंडून घेतात लोक

देशभर दिवाळीचा उत्साह सुरु आहे. लोक दिवाळीचे स्वागत करीत आहेत. गुरुवारी देशातील प्रत्येक भागात रोषणाई केली जाईल. परंतू खूप कमी लोकांना माहिती असेल की भारतात एक असेही गाव आहे जेथील एकही गावकरी दिवाळी साजरी करीत नाहीत.

हिमाचलमधलं एक असं गाव जेथे दिवाळी साजरी होत नाही, घरात कोंडून घेतात लोक
| Updated on: Oct 30, 2024 | 6:45 PM
Share

हिमाचल प्रदेशातील हमीरपुर येथील एका गावात कधीच दिवाळीचा सण साजरा केला जात नाही. हमीरपूर जिल्ह्यातील सम्मू या गावात दिवाळी साजरी तर केली जात नाहीच शिवाय या दिवशी कोणतेही पक्वान तयार केले जात नाही.येथील लोकांच्या मान्यतेनुसार या गावाला एक शाप मिळालेला आहे.त्यामुळे या गावात दिवाळीचा उत्साह साजरा केला जात नाही. जर कोणी हा नियम मोडला तर गावावर संकट येते किंवा अकाली मृत्यू होतो असे म्हटले जाते.

दिवाळीच्या दिवशी घरातून बाहेर पडत नाही

यंदाही हमीपूर जिल्हा मुख्यालयाच्या जवळ 25 किमी दूरवर असलेल्या सम्मू गावात दिवाळीची कोणतेही रोषणाई नाही.येथे शेकडो वर्षांपासून दिवाळी साजरी करण्यास मनाई आहे. दिवाळीला दीप तर पेटवले जातात. परंतू कोणी चुकूनही फटाके फोडले किंवा मिठाई किंवा पंचपक्वान बनवले तर गावात नक्कीच संकट येते अशी गावकऱ्यांची मान्यात आहे. लोकांना या गावाला शापमुक्त करण्यासाठी प्रयत्न देखील झाले होते. अनेकदा हे प्रयत्न झाले होते. परंतू सारे प्रयत्न वाया गेले आहेत. लोकांवर या शापाची इतकी भिती आहे की दिवाळीला लोक घराबाहेर पडण्यास देखील योग्य समजत नाहीत.

दिवाळी केली तर संकट येते

शेकडो वर्षांपासून या गावात दिवाळी साजरी केली नाही. कोणी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला तरी गावात कोणाचा ना कोणाचा तरी मृत्यू होतो किंवा संकट येते असे ठाकूर विधीचंद या बुजुर्गाने म्हटले आहे. हा सण सुरु झाला की वाईट वाटते कारण देशात इतर ठिकाणी सर्वत्र दिवाळी साजरी होते. आजूबाजूच्या गावात दिवाळी सण होतो.त आमच्या गावात हे होऊ शकत नाही असे बीणा नावाच्या महिलेने सांगितले. गावाने या शापातून मुक्त होण्यासाठी अनेक होम हवन केले परंतू यश आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

शापाची कहाणी ?

दिवाळीच्या दिवशी या गावातील एक महिला आपल्या पती सोबत सती गेली होती. महिला दिवाळीसाठी माहेरी जायला निघाली होती. तिचे पती राजाच्या दरबारात सैनिक होता. परंतू महिला गावापासून काही दूर वर असतानाच तिला समजले की तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे.तेव्हा ती महिला गर्भवती होती. महिलेला हा धक्का सहन झाला नाही तिने पती सोबत सती जाण्याचा निर्णय घेतला. जाताना तिने साऱ्या गावाला शाप दिला की या गावातील लोक कधीच दिवाळीचा सण साजरा करु शकणार नाहीत. त्यानंतर या गावात कोणी दिवाळी साजरी केलेली नाही. लोक केवळ सतीच्या मूर्तीची पूजा करतात.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.