AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ गावात दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ‘मौत का खेल’, परंपरा ऐकून धक्काच बसेल

भिडावद गावात दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी एक अद्भुत परंपरा पाळली जाते. गोवर्धन पूजेच्या दिवशी, लोक जमिनीवर झोपतात आणि त्यांच्या अंगावरून गायी पळवल्या जातात. या परंपरेचा उद्देश मनातील इच्छा पूर्ण करणे हा आहे. ही परंपरा पाहण्यासाठी दूरदूरून लोक येतात. गावातील लोकांचा विश्वास आहे की यामुळे देवी-देवतांचे आशीर्वाद मिळतात. हा एक धाडसी आणि अनोखा उत्सव आहे.

'या' गावात दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी 'मौत का खेल', परंपरा ऐकून धक्काच बसेल
Image Credit source: ANI
| Edited By: | Updated on: Nov 02, 2024 | 3:57 PM
Share

देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. प्रथा आणि परंपरेनुसार दिवाळी साजरी केली जात आहे. देशात दिवाळीबाबतच्या अनेक हटके प्रथाही पाळल्या जातात. एका गावात तर दिवाळीच साजरी केली जात नाही. तर देशातील एक असंही गाव आहे, तिथं दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ‘मौत का खेल’ रंगतो. उज्जैनच्या बडनगर तालुक्यातील भिडावद गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. ही परंपरा पाहून लोकांचा थरकाप उडतो. अंगावर रोमांच येतात. अन् पोटात भीतीचा गोळा येतो. या गावातील लोक जमिनीवर झोपतात आणि त्यांच्या अंगावरून गायी पळवल्या जातात. हे चित्र संपूर्ण बघत असतो. परंपरेनुसार लोकांना असं वाटतं की, असं केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजेच्या दिवशी ही परंपरा निभावली जाते.

गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखाली आल्याने देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. आस्थेच्या नावाखाली इथे लोकांच्या जीवाशी खेळले जाते. या समारंभात सहभागी होण्यासाठी लोकांना परंपरेनुसार पाच दिवस उपवास करावा लागतो.

मोठी मिरवणूक

ही परंपरा कधी सुरू झाली कुणालाच माहीत नाही. पण गावातील बुजुर्ग असोत की तरुण… सर्वच जण ही परंपरा आणि प्रथा पाहूनच मोठे झाले आहेत. ही प्रथा आणि परंपरा पाहण्यासाठी आता आजूबाजूच्या गावातील लोक येतात. इतर राज्यातील लोकही या गावाकडे येत असतात. ज्यांना आपला नवस करायचा असतो त्यांना दिवाळीच्या पाच दिवस आधी घर सोडावं लागतं. माता भवानीच्या मंदिरात येऊन हे लोक राहतात. दिवाळीच्या आदल्या दिवशी एक मोठी जत्रा भरते.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला सकाळी पूजा होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात गावातून मोठी मिरवणूक काढली जाते. त्यानंतर ज्यांचे नवस असतात ते लोक जमिनीवर झोपतात. त्यानंतर त्यांच्या अंगावरून गायी पळवल्या जातात. असं केल्याने देवी आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने आपला नवस पूर्ण होईल, मनातील इच्छा पूर्ण होतील असं या लोकांना वाटतं. या अनोख्या परंपरेत आता पंचक्रोशीतील लोकही सामील होताना दिसत आहेत. त्यांनाही आपल्या मनातील इच्छा पूर्ण करायच्या असतात. काहींना घर बांधायचं असतं, तर काहींचं लग्न जुळत नाही, काहींना मुल होत नाही तर काहींच्या हातात पैसा टिकत नाही. तर काहींना कामधंदा हवा असतो, अशा एक ना अनेक गोष्टींसाठी लोक नवस करतात आणि या अग्निदिव्याला सामोरेही जातात.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.