AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ गावात दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ‘मौत का खेल’, परंपरा ऐकून धक्काच बसेल

भिडावद गावात दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी एक अद्भुत परंपरा पाळली जाते. गोवर्धन पूजेच्या दिवशी, लोक जमिनीवर झोपतात आणि त्यांच्या अंगावरून गायी पळवल्या जातात. या परंपरेचा उद्देश मनातील इच्छा पूर्ण करणे हा आहे. ही परंपरा पाहण्यासाठी दूरदूरून लोक येतात. गावातील लोकांचा विश्वास आहे की यामुळे देवी-देवतांचे आशीर्वाद मिळतात. हा एक धाडसी आणि अनोखा उत्सव आहे.

'या' गावात दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी 'मौत का खेल', परंपरा ऐकून धक्काच बसेल
Image Credit source: ANI
| Edited By: | Updated on: Nov 02, 2024 | 3:57 PM
Share

देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. प्रथा आणि परंपरेनुसार दिवाळी साजरी केली जात आहे. देशात दिवाळीबाबतच्या अनेक हटके प्रथाही पाळल्या जातात. एका गावात तर दिवाळीच साजरी केली जात नाही. तर देशातील एक असंही गाव आहे, तिथं दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ‘मौत का खेल’ रंगतो. उज्जैनच्या बडनगर तालुक्यातील भिडावद गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. ही परंपरा पाहून लोकांचा थरकाप उडतो. अंगावर रोमांच येतात. अन् पोटात भीतीचा गोळा येतो. या गावातील लोक जमिनीवर झोपतात आणि त्यांच्या अंगावरून गायी पळवल्या जातात. हे चित्र संपूर्ण बघत असतो. परंपरेनुसार लोकांना असं वाटतं की, असं केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजेच्या दिवशी ही परंपरा निभावली जाते.

गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखाली आल्याने देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. आस्थेच्या नावाखाली इथे लोकांच्या जीवाशी खेळले जाते. या समारंभात सहभागी होण्यासाठी लोकांना परंपरेनुसार पाच दिवस उपवास करावा लागतो.

मोठी मिरवणूक

ही परंपरा कधी सुरू झाली कुणालाच माहीत नाही. पण गावातील बुजुर्ग असोत की तरुण… सर्वच जण ही परंपरा आणि प्रथा पाहूनच मोठे झाले आहेत. ही प्रथा आणि परंपरा पाहण्यासाठी आता आजूबाजूच्या गावातील लोक येतात. इतर राज्यातील लोकही या गावाकडे येत असतात. ज्यांना आपला नवस करायचा असतो त्यांना दिवाळीच्या पाच दिवस आधी घर सोडावं लागतं. माता भवानीच्या मंदिरात येऊन हे लोक राहतात. दिवाळीच्या आदल्या दिवशी एक मोठी जत्रा भरते.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला सकाळी पूजा होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात गावातून मोठी मिरवणूक काढली जाते. त्यानंतर ज्यांचे नवस असतात ते लोक जमिनीवर झोपतात. त्यानंतर त्यांच्या अंगावरून गायी पळवल्या जातात. असं केल्याने देवी आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने आपला नवस पूर्ण होईल, मनातील इच्छा पूर्ण होतील असं या लोकांना वाटतं. या अनोख्या परंपरेत आता पंचक्रोशीतील लोकही सामील होताना दिसत आहेत. त्यांनाही आपल्या मनातील इच्छा पूर्ण करायच्या असतात. काहींना घर बांधायचं असतं, तर काहींचं लग्न जुळत नाही, काहींना मुल होत नाही तर काहींच्या हातात पैसा टिकत नाही. तर काहींना कामधंदा हवा असतो, अशा एक ना अनेक गोष्टींसाठी लोक नवस करतात आणि या अग्निदिव्याला सामोरेही जातात.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!