AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या भारतीय मंदिराला १३ अब्ज रुपयांचे दान, ४००० किलोचे सोनेपाहून श्रीमंत देशही हादरले

देशात अनेक सारे मंदिरं आहेत जेथे भक्त आपल्या श्रद्धेनुसार दान करीत असतात. कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात दान केले जाते. यातील एका देवस्थानात तर दानात हजारो कोटी रुपये आणि हजारो सोने दान केले जाते.

या भारतीय मंदिराला १३ अब्ज रुपयांचे दान, ४००० किलोचे सोनेपाहून श्रीमंत देशही हादरले
Tirupati balaji mandir
| Updated on: Aug 03, 2025 | 6:42 PM
Share

भारतातील देवस्थानं गर्भश्रीमंत आहेत. अनेक बातम्यांनुसार तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) येथील भगवान वेंकटेश्वर यांच्या भक्तांकडून दरवर्षी लाखो रुपये दान केले जातात. या हे सर्व दान मंदिराच्या हुंडीत जमा होते. या दानास श्री वराह स्वामी मंदिरातील नवीन पराकामणी भवनात वेगवेगळे केले जाते. रोख रक्कम आणि नाण्यांची मोजणी नियमितपणे केली जाते. तर सोने आणि मुल्यवान वस्तूंना सुरक्षेत लॉकरमध्ये जमा केले जाते. महिन्याच्या अखेरीस या वस्तू टीटीडी ट्रेझरी तिरुपती मंदिरात पाठवली जाते. तिरुमाला तिरुपती देवस्थानमने जारी केलेल्या आकड्यांनुसार २०२४ मध्ये एकूण १,३६५ कोटी रुपयांचे रेकॉर्ड हुंडी उत्पन्न प्राप्त झाले आहे.

या तिरुपती बालाजी मंदिरात साल २०२२ मध्ये श्रीवारीच्या हुंडीचे उत्पन् १,२९१.६९ कोटी होते. तर २०२३ मध्ये हे १,३९१.८६ कोटी होते. गेल्यावर्षी २.५५ कोटी भक्त मंदिरात आले होते. ९९ लाख लोकांनी केसदान केले आणि ६.३० कोटी लोकांना अन्नप्रसादम देण्यात आला. या शिवाय १२.१४ कोटी लाडू विकले गेले. तुलना केली असता २०२२ मध्ये हे उत्पन्न १,२९१.६९ कोटी रुपये होते आणि २०२३ मध्ये १,३९१. ८६ कोटी रुपये होते.

४,००० किलोग्रॅम सोने दान

रोकड वगळून ४,००० किलोग्रॅम सोने तिरुमाला तिरुपती देवस्थानमला दान म्हणून मिळाले आहे. आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये १,०३१ किलोग्रॅम सोने जमा झाले आहे. ज्यामुळे आतापर्यंत एकूण ११,३२९ किलोग्रॅम सोने जमा झाले आहे. टीटीडीमध्ये दान केलेले सोने बँकेत जमा केले जाते. गेल्या तीन वर्षात ६११ कोटी रुपये हुंडी दानामुळे, १,१६७ कोटी व्याजातून आणि १५१.५० कोटी केसदानातून आणि १४७ कोटी रुपये खोल्या आणि कल्याण मंडप वाटपातून येण्याची आशा आहे.

दानातून होतात ही कामे

मनुष्यबळ विकास आणि अन्य योजनांसाठी यातील मोठी रक्कम दान केली जाते. त्याशिवाय १,७७३ कोटी रुपये वेतन आणि भत्त्यांवर खर्च होते. आणि ३५० कोटी अभियांत्रिकी कामासाठी खर्च केली जाते. तर १०८.५० कोटू रुपये हिंदू धर्म प्रसार परिषदसाठी आणि ११३.५० कोटी रुपये विविध संस्थांना वाटली गेली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.