AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अखंड भारता’ची विचारधारा, शंकर महादेवनकडून RSS च कौतुक, ‘या’ भाजपा नेत्याकडून खास टि्वट

शंकर महादेवन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘अखंड भारता’च्या विचारधारेच समर्थन, कौतुक केलं. त्यानंतर एका केंद्रीय मंत्र्याने शंकर महादेवन यांचं अभिनंदन करणारी सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली. RSS च्या विजयादशमीच्या कार्यक्रमात शंकर महादेवन सहभागी झाले होते.

‘अखंड भारता’ची विचारधारा, शंकर महादेवनकडून RSS च कौतुक, 'या' भाजपा नेत्याकडून खास टि्वट
shankar mahadevan
| Updated on: Oct 25, 2023 | 1:47 PM
Share

नागपूर : विजयादशमीच्या निमित्ताने नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ‘दसरा’ कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी शंकर महादेवन यांनी आरएसएसच्या कार्याच कौतुक केलं. ‘अखंड भारता’ची विचारधारा, परंपरा आणि संस्कृती पुढे नेण्यात आरएसएसच मोठ योगदान आहे अशा शब्दात शंकर महादेवन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच कौतुक केलं. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी X वर पोस्ट करुन शंकर महादेवन यांचं कौतुक केलय. “तुम्ही तुमच्या संगीताने देशाची मुल्य आणि भारताच्या शाश्वत संस्कृतीच प्रदर्शन केल्याबद्दल पद्म श्री शंकर महादेवन यांचं मी अभिनंदन करतो” असं धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शंकर महादेवन म्हणाले की, “मी खरच नशिबवान आहे. मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली” या कार्यक्रमात संघाच्या स्वयंसेवकांनी ‘पथ संचलन’ केलं. मागच्यावर्षी विजयादशमीच्या कार्यक्रमात RSS कडून पहिल्यांदा एका महिलेला मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात आलं होतं. मागच्यावर्षीच्या संघाच्या कार्यक्रमाला दोनवेळा माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या संतोष यादव मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी सर्वप्रथम 1992 आणि त्यानंतर 1993 साली माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केला होता.

‘या’ समितीमध्ये शंकर महादेवन यांचा समावेश

शिक्षण मंत्रालयाने एनसीईआरटीच्या 3 ते 12 वी पर्यंतच्या पुस्तक तयार करण्याच्या समितीमध्ये शंकर महादेवन यांचा समावेश करण्यात आला आहे. महादेवन यांच्यासह समितीमध्ये एकूण 19 लोक आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.