AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच सरकार पाडलं; कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचा रोख खासकरून राज्यपालांच्या भूमिकेवर होता.

सर्वात मोठी बातमी ! मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच सरकार पाडलं; कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 16, 2023 | 1:23 PM
Share

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठीच सरकार पाडलं. शिंदे यांनी सरकार पाडलं. त्यामुळे त्यांच्या बेईमानीचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं, असा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची बाजू मांडताना एकनाथ शिंदे आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच सरकार पाडण्यात राज्यपालांचा वापर कसा झाला हे सुद्धा अधोरेखित केलं आहे.

राज्यपाल सरकार अस्थिर करू शकत नाही. पण सरकार पाडण्यासाठी राज्यपालांचा वापर करण्यात आला. राज्यपाल हे विधीमंडळ पक्षाशी संवाद ठेवू शकतात. वैयक्तिक कोणाशीही नाही. पक्षातील अंतर्गत वादाकडे राज्यपाल लक्ष देऊ शकत नाही. राज्यपाल कोणा एकाला तुम्हीच आता मुख्यमंत्री असं म्हणू शकत नाही, राज्यपालांनी शिंदे यांच्या बाबतीत तेच केलं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

वेगवेगळ्या भूमिका

बंड केल्यानंतर शिंदे गटाच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या. आधी सांगितलं आम्हीच शिवसेना, नंतर सांगितलं पक्षप्रमुखांना कंटाळून बाहेर पडलो. मुख्यमंत्री बनण्यासाठी शिंदेंनी सरकार पाडलं. शिंदेंच्या बेईमानीचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्री बनवलं, असंही सिब्बल यांनी सांगितलं.

बहुमताला विरोध नाही

निवडणूक आयोगाचा निर्णय नसताना विधिमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष म्हणून राज्यपालांनी मान्यता दिल्याचं दिसतंय. निवडणूक आयोगाचं काम राज्यपालांनी केल्यासारखं दिसतंय. बहुमताला नाही, ज्या परिस्थितीत आदेश दिला त्याला विरोध आहे. भरत गोगावले यांची पक्षप्रतोदपदी कशाच्या आधारे नियुक्ती केली? असा सवाल करतानाच 10 व्या सूचीत राजकीय पक्षाच्या फुटबाबत स्पष्टता आहे. तत्कालीन पंतप्रधान नरसिम्हा राव यांनी अल्पमतातील सरकार चालवून दाखवलं, असंही त्यांनी सांगितलं.

कोर्टाच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर ठाकरे गटाचेच वकील अभिषेक मनू सिंघवी हे बाजू मांडतील. त्यानंतर कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोर्ट निकालाची तारीख जाहीर करतं की आणखी काही भाष्य करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.