AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजही भारत ‘या’ एका गोष्टीसाठी पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून, प्रत्येक भारतीय कुटुंबात दररोज होतो वापर

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. आयात -निर्यात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आजही भारत 'या' एका गोष्टीसाठी पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून, प्रत्येक भारतीय कुटुंबात दररोज होतो वापर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 03, 2025 | 4:51 PM
Share

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानवरील दबाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार बंद झाला आहे. या मार्गानं भारताचा पाकिस्तानसोबत व्यापार सुरू होता. भारतातून पाकिस्तानला सोयाबीन, पोल्ट्री फीड, भाजीपाला, लाल मिर्ची, प्लास्टिकचे दाने आणि विविध प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तू निर्यात केल्या जात होत्या तर पाकिस्तानमधून सुखा मेवा, खजूर, जिप्सम, सीमेंट, काच आणि सैंधव मीठ यासारख्या वस्तू आयात केल्या जात होत्या. मात्र आता आयात-निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे.

भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, मात्र विकासाच्या बाबतीमध्ये भारत पाकिस्तानच्या खूप पुढे निघून गेला. भारत आज सर्वच क्षेत्रांमध्ये स्वावलंबी बनला आहे, तर पाकिस्तानला मात्र आजही अनेक गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबू राहवं लागत आहे. परंतु एक गोष्ट अशी आहे, की ज्यासाठी आजही भारत पाकिस्तानवर पूर्णपणे अवलंबू आहे.ती गोष्ट म्हणजे सैंधव मीठ, सैंधव मिठाचा जवळपास सर्वच पुरवठा भारताला पाकिस्तानमधून होतो.

सैंधव मिळाला रॉक सॉल्ट, लाहोरी मीठ, गुलाबी मीठ, हिमालयीन मीठ अशा वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. भारतामध्ये वेगवेगळ्या व्रत आणि सणोत्सवांमध्ये तसेच उपवासासाठी या मिठाचा वापर केला जातो. कारण या मिठाला शुद्ध मीठ मानलं जातं. त्यामुळे या मिठाची भारतात मोठी मागणी आहे. परंतु मागणी असताना देखील या मिठाचं उत्पादन भारतामध्ये फारच थोड्याप्रमाणात होतं. त्यामुळे या मिठासाठी आपण पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबू आहोत. पाकिस्तानमध्ये या मिठाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होतं.

पाकिस्तानच्या पंजबा प्रांतामध्ये या मिठाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं. पंजाबच्या झेलम जिल्ह्यात खेवडा नावाची मिठाची खान ही जगातील दुसऱ्या नंबरची सैंधव मीठाची मोठी खान आहे, त्यामुळे पाकिस्तानमध्ये या मिठाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. मात्र आता आयात बंद असल्यामुळे या मिठाचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.