AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता युद्ध झालं पाहिजे, माझं रक्त खवळत आहे…’ पहलगाम हल्ल्यावर दिशा पाटनीच्या बहिणीची संतप्त प्रतिक्रिया

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहेत. आता या दहशतवादी घटनेवर दिशा पाटनीची बहीण, माजी लेफ्टनंट खुशबू पाटनी हिनेही आपला संताप व्यक्त केला आहे. 'माझं रक्त खवळत आहे' असे ती म्हणाली आहे.

‘आता युद्ध झालं पाहिजे, माझं रक्त खवळत आहे…’ पहलगाम हल्ल्यावर दिशा पाटनीच्या बहिणीची संतप्त प्रतिक्रिया
Khushbu PataniImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 24, 2025 | 6:39 PM
Share

नुकतंच नवजात बालकाचे प्राण वाचवणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीची बहीण खुशबू सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या या कार्यानंतर सर्वत्र तिचीच चर्चा होत आहे. आता तिने पहलगाममधील दहशतवादी घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “माझं रक्त खवळत आहे. हा केवळ दहशतवादी हल्ला नाही, तर यामध्ये पाकिस्तानी लष्कराचा पूर्णपणे सहभाग आहे” असे खुशबू म्हणाली आहे. तसेच पुढे तिने, आता युद्ध झालं पाहिजे असे देखील म्हटले आहे.

75 वर्षांपासून आम्ही सहन करत आहोत

खुशबूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये एक व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये ती बोलताना दिसत आहे की, “पहलगाममध्ये काय झालं हे सर्वांना माहीत आहे आणि यालाच कलयुग म्हणतात. हे कलयुग आहे. असं म्हणतात की युद्ध हा शेवटचा पर्याय असावा. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा युद्ध लढलं जातं. मला वाटतं आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत. 75 वर्षांपासून आम्ही पाकिस्तानी आणि पाकिस्तानला सहन करत आहोत. प्रेम आणि शांतीचे खूप नाटक झाले.”

Pahalgam Terror Attack: भारतात दहशतवादी हल्ला होताच पाकिस्तानमधील लोकांनी गुगलवर काय सर्च केलं?

आता आरपारची लढाई झाली पाहिजे

खुशबू पुढे म्हणाली, “त्यांनी हिंदूंना मारलं. हा केवळ दहशतवादी हल्ला नाही, तर यामध्ये पाकिस्तानी लष्कराचा पूर्ण सहभाग आहे. आपण दहशतवादी, दहशतवादी असं न करता पाकिस्तानी लष्कर असं म्हणायला हवं. भारतीय लष्करातील माजी मेजर म्हणून मी सांगू इच्छिते की, आपल्याकडे चांगली फौज आहे. 15 लाखांहून अधिक जवान आहेत. आता युद्ध झालं पाहिजे. याचा फार विचार करायला नको. असा कोणता धर्म आहे, असे कोणते पुस्तक आहे ज्यामध्ये लिहिलं आहे की तुम्ही निरपराध लोकांना मारू शकता?”

माझं रक्त खवळत आहे

खुशबूने आपला संताप व्यक्त करताना पुढे म्हटलं, “आपले लष्कर खूप चांगले आहे आणि त्यांना उत्तम प्रशिक्षण दिलं गेलं आहे. ऑर्डर मिळण्याची तयारी झाली पाहिजे. याला हलक्यात घेऊ नये. कारण यांचा उद्देश फक्त जिहाद करणं आहे आणि त्यांना भारतीय आवडत नाहीत, मग ते कोणत्याही धर्माचे असो. माझं रक्त जळत आहे, खवळत आहे.”

दहशतवादाविरुद्ध एकजुट व्हायला हवं

खुशबूने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलं, “मला ऐकून खूप बरं वाटलं की सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावलं उचलली आहेत आणि आशा आहे की त्या सर्व दहशतवाद्यांना लवकरच त्यांच्या कृत्यांचा परिणाम भोगावा लागेल. हा तो वेळ आहे जेव्हा सर्व भारतीयांनी दहशतवादाविरुद्ध एकजुट व्हायला हवं आणि आपल्या देशात शांती आणि सौहार्द आणण्यासाठी सरकारच्या निर्णयांचं प्रामाणिकपणे समर्थन करायला हवं. चला, आपण सर्व एकजुट होऊन काम करू.”

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.