AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारतानं पाकिस्तानचे दोन दावे अन् एक मागणी फेटाळली

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर परराष्ट्र मंत्रालयाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आहेत.

मोठी बातमी! भारतानं पाकिस्तानचे दोन दावे अन् एक मागणी फेटाळली
| Updated on: May 08, 2025 | 6:37 PM
Share

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं बदला घेतला आहे, पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. दरम्यान ऑपरेश सिंदूरच्या यशानंतर आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेले दावे भारतानं फेटाळून लावले आहेत. तसेच पाकिस्तानची मागणी देखील फेटाळून लावली आहे.

काय आहे पाकिस्तानचा दावा?   

भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये आमचे 26 नागरिक मारले गेले आणि 46 जण जखमी झाले आहेत, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता, तसेच आमच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आल्याचं देखील पाकिस्तानने म्हटलं होतं. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संयुक्त चौकशी करा अशी मागणी देखील पाकिस्तानने केली होती, मात्र ही मागणी आणि दावे भारतानं फेटाळून लावले आहेत.

नेमकं काय म्हणाले विक्रम मिसरी?   

 7 तारखेच्या स्ट्राईकमध्ये नागरिक मारल्याचं पाकिस्तानकडून सांगितलं जातं. पण आम्ही टार्गेट ठेवून हल्ला केला होता. काल दहशतवाद्यांचा दफनविधी होता. त्यात कोणताही सिव्हिलियन मारला गेला नसल्याचं स्पष्ट होतं. माझ्या हातात फोटो आहे. त्यात पाकिस्तानी अधिकारी आहेत. पाकिस्तानी ध्वज आहेत. मारलेल्या दहशतवाद्यांना स्टेट हॉनर दिला गेला याचं मला आश्यर्य वाटलं.

भारताने धार्मिक स्थळांवर हल्ला केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानचा हा दावा चुकीचा आहे. आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या तळांवरच हल्ला केला आहे. दुर्देवाने पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी  धार्मिक स्थळांचा सहारा घेत आहे, असं मिसरी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची संयुक्त चौकशी व्हावी अशी मागणी पाकिस्तानने केली होती, मात्र ती मागणी देखील भारतानं फेटाळून लावली आहे, 26/11 आणि पठाण कोट हल्ल्यानंतर सर्व पुरावे देऊन देखील पाकिस्तानचं अपेक्षित सहकार्य मिळालं नसल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.