AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers Protest | सरकारशी सकारात्मक चर्चा, कोणत्या मुद्यांवर सहमती; आज शेतकरी मोर्चा होल्डवर ?

चौथ्या फेरीत शेतकरी आणि सरकारमध्ये सकारात्मक चर्चा झाली. सरकारने शेतकऱ्यांना MSPबाबत प्रस्ताव दिला. मात्र त्या मुद्यावर शेतकरी संघटना आज त्यांचा निर्णय जाहीर करतील. शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांवरही चर्चा सुरूच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

Farmers Protest | सरकारशी सकारात्मक चर्चा, कोणत्या मुद्यांवर सहमती; आज शेतकरी मोर्चा होल्डवर ?
| Updated on: Feb 19, 2024 | 8:30 AM
Share

नवी दिल्ली | 19 फेब्रुवारी 2024 : चंदीगडमध्ये शेतकरी नेते आणि तीन केंद्रीय मंत्र्यांमध्ये चर्चेची चौथी फेरी सुमारे चार तास चालली. या बैठकीत केंद्र सरकारने आणखी चार पिकांना एमएसपी देण्याचे मान्य केले. सरकारच्या या प्रस्तावावर शेतकरी आपापसात चर्चा करून सरकारशी पुन्हा चर्चा करतील. या चौथ्या फेरीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मुंडा, नित्यानंद राय तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील उपस्थित होते. केंद्र सरकारने एसएसपीमध्ये पिकांचे डायव्हर्सिफिकेशन आणि इतर काही पिकांच्या खरेदीबाबत शेतकऱ्यांना नवीन प्रस्ताव दिला आहे.

केंद्राने दिलेल्या MSPबाबत दिलेल्या या प्रस्तावावर शेतकरी खूश दिसत आहेत. या प्रस्तावाबाबत शेतकरी नेते आपापसात चर्चा करतील, तर इतर वादग्रस्त मुद्द्यांवर केंद्रीय मंत्री सरकारशी चर्चा करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी चर्चा करतील. दरम्यान, शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारीला दिल्लीच्या दिशेने कूच करण्याची त्यांची योजना सध्या स्टँडबाय मोडवर ठेवल्याचे जाहीर केले आहे. सर्व पिकांची एमएसपीवर खरेदी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी इत्यादी मागण्यांवर अद्याप एकमत झालेले नाही. सर्व मागण्यांवर विचार करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला 48 तासांचा म्हणजेच दोन दिवसांचा अवधी दिला आहे.

शांततेच्या मार्गाने पुढे जाऊ द्या

आम्ही आमचा मंच आणि तज्ञांशी सरकारच्या प्रस्तावावर (एमएसपी) चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ, असे शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत इतर अनेक मागण्यांवर वाटाघाटी क रण्याची गरज आहे. आमचा मोर्चा (दिल्ली चलो) सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. तर शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर म्हणाले की, ‘आम्ही 19 आणि 20 फेब्रुवारीला आमच्या मंचावर चर्चा करू आणि तज्ज्ञांची मते घेऊ. या आधारेच पुढील निर्णय घेतला जाईल. 21 फेब्रुवारीचा आमचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता आहे, तो अद्याप स्टँडबायवर आहे.’.

एमएससी, स्वामीनाथन आयोग आणि इतर मुद्यांवर चर्चा झाली. (सरकारकडून) जो प्रस्ताव आला आहे तो शेतकऱ्यांच्या हितार्थ आहे की नाही, त्यावर (आम्ही) चर्चा करून निर्णय घेऊ. सरकारही त्यांच्या व्यासपीठावर इतर मुद्द्यांवर चर्चा करेल आणि आम्हाला निर्णय कळवेल. केंद्र सरकारला आमचे आवाहन आहे की आम्हाला शांततेने पुढे जाण्याची परवानगी द्यावी. इतर मुद्द्यांवरही सरकारशी चर्चा झाली आहे. प्रश्न मार्गी न लागल्यास 21 फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता पुन्हा मोर्चा काढण्यात येईल, असे ते म्हणाले.

याआधीही 8, 12 आणि 15 फेब्रुवारी असे तीन दिवस सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चा झाली होती. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आपल्या मागण्यांबाबत दिल्लीकडे कूच करण्यासाठी शंभू आणि खनौरी बॉर्डर येथे थांबले आहेत.

5 वर्षांच्या कराराचा प्रस्ताव

NCCF, NAFED आणि CCI यांसारख्या सहकारी संस्था धान आणि गहू, तसेच मसूर, उडीद, मका आणि कापूस पिकांच्या MSP वर 5 वर्षांसाठी शेतकऱ्यांशी करार करतील, ज्यामध्ये खरेदीवर कोणतीही मर्यादा नसेल. असा प्रस्ताव सरकारतर्फे देण्यात आला आहे. सरकारच्या या प्रस्तावावर शेतकरी त्यांच्या संघटना आणि तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय देणार असल्याचे नमूद केले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.