AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर समोर येताच वधू बोलली ‘ते’ शब्द; ज्या मंडपात फुलं उधळले तिथेच वऱ्हाडांची लाठ्या -काठ्यानं मारहाण

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, नवरीने केलेल्या दाव्यानंतर दोन्ही कुटुंबात चांगलंच भांडण झालं, लाठ्या -काठ्यानं मारहाण देखील करण्यात आली आहे.

वर समोर येताच वधू बोलली 'ते' शब्द; ज्या मंडपात फुलं उधळले तिथेच वऱ्हाडांची लाठ्या -काठ्यानं मारहाण
| Updated on: Apr 27, 2025 | 5:48 PM
Share

उत्तर प्रदेशच्या भदोहीमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. भदोहीमध्ये एका कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. शेवटी लग्नाचा दिवस देखील आला. लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री बॅण्ड बजासह वऱ्हाड देखील वधूच्या घरी दाखल झालं, सगंळ काही उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात सुरू होतं. मात्र असं काही घडलं, ज्यामुळे क्षणात सर्व बदललं, नवरीने लग्नाला नकार दिला. वर लग्नासाठी मंडपात आला, मात्र जेव्हा नवरीने त्याला पाहिलं तेव्हा तीने लग्नाला नकार दिला, मला ज्याचा फोटो दाखवण्यात आला, तो हा नाहीच असा आरोप तीने केला. त्यानंतर वर आणि वधुच्या कुटुंबात तब्बल दोन तास चर्चा झाली, मात्र नवरी लग्नाला तयार झाली नाही, त्यामुळे वराला लग्न न करताच घरी परतावं लागलं.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना भदोहीमधील एका गावात घडली आहे, शुक्रवारी रात्री वऱ्हाड नवरदेवासह वधूच्या घरी दाखल झालं. वधू पक्षानं देखील वर पक्षाचं जोरदार स्वागत केलं. त्यांच्यावर फुलं उधळण्यात आली, त्यांच्या स्वागताला डिजे देखील लावण्यात आला. विवाहापूर्वी करण्यात येणारे सर्व कार्यक्रम सुरू होते, कुटुंबात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. अवघ्या काही वेळेत लग्न होणार होतं. मात्र वर मंडपात येताच मुलीनं लग्नाला नकार दिला. आपल्याला जो फोटो दाखवण्यात आला, तो हा मुलगा नाहीच असा दावा या मुलीनं केला आहे. त्यानंतर तिची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही कुटुंबात दोन तास चर्चा झाली, मात्र यावर मार्ग न निघाल्यानं अखेर वराला लग्न न करताच परत घरी यावं लागलं.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आपल्याला लग्नासाठी ज्या मुलाचा फोटो दाखवण्यात आला, तो हा मुलगा नाहीच असा दावा या तरुणीनं केला. त्यानंतर दोन्ही कुटुंबात चर्चा सुरू झाली. मात्र त्यानंतर चर्चेच रूपांतर भांडणात झालं, दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटवण्यात आला. त्यानंतर वर लग्न न करताच घरी परतला.

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...