ममता, हिंमता, थलपती …पाच राज्यातील ‘विजया’चे पक्के गणित, कुणाचा होमवर्क पडला कमी?
Five State Assembly Election 2026: भाजपने तीन राज्यात झेंडा रोवला. त्यात पश्चिम बंगालमधील विजयाने पूर्वोत्तर राज्यातील गणितं बदलणार आहेत. भाजपने ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची सत्ता उखडून फेकली. तर इतर राज्यातील विजयाचे आणि हाराकिरी लक्षात घ्या.

Mamata-Himanata-Thalpati Vijay: देशातील चार राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशातील निवडणूक निकालाची देशभर चर्चा आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकीत भाजपचा वरचष्मा दिसला. तीन ठिकाणी भाजपचा झंझावात दिसला. काँग्रेस आघाडीने केरळम राज्यात मोठा विजय मिळवला. तर सुपरस्टार थलपती विजयने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अर्थात तामिळनाडूत त्रिशंकू स्थिती आहे. विधानसभेत टीव्हीके एकटी सत्ता स्थापन करू शकत नाही. भाजप युती असलेल्या AIADMK आघाडीचा सत्तेत प्रवेश होईल. म्हणजे भाजपचा सत्तेत चंचु प्रवेश होईल.
पश्चिम बंगालचा विजय गेमचेंजर
पश्चिम बंगालमधील विजय भाजपसाठी गेमचेंजर ठरणार आहे. कारण यामुळे पूर्वोत्तर राज्यातील अजून एक मोठे राज्य त्यांच्या ताब्यात आले आहे. सेव्हन सिस्टर प्रदेशात भाजपचा गड अधिक मजबूत होण्यास सुरुवात होईल. 294 जागा असलेल्या विधानसभेत भाजपने 206 जागा जिंकत इतिहास रचला आहे. ममता सरकारची सत्ता 15 वर्षांनी संपली. तर काँग्रेस आता केवळ दोन जागांवर मर्यादित झाली. ममता बॅनर्जी यांना बालेकिल्ला भवानीपूर सुद्धा टिकवता आला नाही. त्या पराभूत झाल्या. त्या आता मुख्यमंत्री नाही आणि ना आमदार असतील. 2026 मधील निवडणूक ही त्यांच्यासाठी आत्मपरिक्षणासाठी महत्त्वाची ठरली आहे.
आसामध्ये हिंमता यांनी काँग्रेसची नाही शिजू दिली डाळ
आसामध्ये पुन्हा एकदा हिंमता बिस्वा सर्मा सरकार आले. यंदा काँग्रेसच्या गोगाई यांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. पण आसाम संस्कृतीवर बांगलादेशातील मुस्लिम घुसखोरांचा आक्रमण हा मुद्दा कळीचा ठरला. स्थानिक मुद्दांवर सर्मा सरकारने अपील केले. हिंमता यांच्या योजनांना लोकांनी प्रतिसाद दिला. एकूण 126 विधानसभा जागा असलेल्या आसामध्ये NDA ने 102 जागा जिंकल्या. काँग्रेसला केवळ 21 जागी विजय मिळवता आलाा. तर AIUDF ला केवळ 2 जागा मिळाल्या. काँग्रेसचा सर्वात मोठा चेहरा गौरव गोगाई यांना जोरहाज हा गड टिकवता आला नाही.
पुद्दुचेरीत एनडीए आघाडीत परत
पुद्दुचेरीत एनडीए आघाडी परत आली. 30 जागांच्या पुद्दुचेरी आघाडीने 18 जागा काबीज केल्या. तर काँग्रेसला इथं केवळ 6 जागा मिळवता आल्या. तर टीव्हीकेने येथे 3 जागा मिळवल्या. बेस्ट पुद्दुचेरी हा संकल्प भाजपच्या विजयात सर्वात महत्त्वाचा ठरला.
तामिळनाडूत थलपतीचा ‘विजय’
तामिळनाडू राज्यात थलपती विजय याच्या टीव्हीके पक्षाने कमाल केली. कोणी हा पक्ष इतकी मुसंडी मारेल याची कल्पनाही केली नव्हती. पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या या पक्षाने 234 विधानसभेच्या जागांपैकी तामिळनाडूत 108 जागा काबीज केल्या. टीव्हीकेने स्टॅलिन यांची सत्ता उलथवली. डीएमक आघाडीला केवळ 73 जागा मिळाल्या. तर भाजप आघाडी असलेल्या AIADMK ला 52 जागा मिळाल्या. त्यामुळे भाजप पहिल्यांदाच राज्याच्या सत्ताकारणात प्रवेश करेल असे चित्र आहे.
केरळम राज्यात काँग्रेससाठी आनंदवार्ता
केरळम राज्यात काँग्रेससाठी आनंदवार्ता आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट UDF ने डाव्या पक्षांची गेल्या 10 वर्षांपासूनची सत्ता उलथवून टाकली. UDF ने 140 विधानसभा जागा असलेल्या केरळम मध्ये 89 जागा मिळवल्या. गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट जागा काबीज केल्या आहेत. एलडीएफने 35 जागा पटकावल्या. तर भाजपच्या आघाडीला केरळममध्ये सूर गवसला नाही. या आघाडीला केवळ 3 जागा मिळवता आल्या.
