AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट, आठव्या वेतन आयोगाचे गठन करण्यास मंजुरी, किती होणार पगार

8th Pay Commission: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट, आठव्या वेतन आयोगाचे गठन करण्यास मंजुरी, किती होणार पगार
8th Pay Commission
| Updated on: Jan 16, 2025 | 3:51 PM
Share

8th Pay Commission: केंद्रीय मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीतून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. बैठकीनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल. तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या सूचनाही विचारात घेतल्या जातील. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही घोषणा केली.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. त्याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, हा आयोग 2026 पर्यंत स्थापन केला जाईल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी यापूर्वीच लागू केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना चांगली बातमी दिली आहे. आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देऊन सर्व कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवर गेला आहे. त्यावेळी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अनेक महिन्यांपासून आठव्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत होते. आता सरकारने त्यांची प्रतिक्षा संपवली आहे.

२०१६ मध्ये लागू झाला होता सातवा वेतन आयोग

वेतन आयोग दर दहा वर्षांनी लागू केला जातो. यापूर्वी २०१६ मध्ये वेतन आयोग लागू केला होता. सातव्या वेतन आयोगापूर्वी चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ दहा दहा वर्षांचा होता. सातवा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू झाला होता आणि तो डिसेंबर २०२५ मध्ये त्याचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यापूर्वीच सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.

किमान मूळ वेतन किती असणार?

आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होण्याची शक्यता आहे. अहवालांनुसार अंतर्गत फिटमेंट फॅक्टर किमान 2.86 निश्चित केला जाऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात समान वाढ होईल आणि ती 51,480 रुपये होऊ शकते. सध्या किमान मूळ वेतन 18000 रुपये आहे. यासोबतच निवृत्तीवेतनधारकांनाही हाच लाभ मिळणार आहे. त्यांचे किमान पेन्शन सध्याच्या 9000 रुपयांवरून 25,740 रुपयांपर्यंत वाढणार आहे.

Follow Us
मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु - फडणवीस
मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु - फडणवीस.
अर्थसंकल्प मांडताना फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणाले?
अर्थसंकल्प मांडताना फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणाले?.
दिवंगत अजित पवारांचं भव्य स्मारक उभारणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
दिवंगत अजित पवारांचं भव्य स्मारक उभारणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
राज्यातल्या स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा सेवा सुरू!
राज्यातल्या स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा सेवा सुरू!.
डिजीटल सेवांद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार
डिजीटल सेवांद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार.
पुढील 5 वर्षांत भरीव निधी देणार! मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
पुढील 5 वर्षांत भरीव निधी देणार! मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन.
संत गाडगे बाबा तीर्थक्षेत्र विकसित करण्यात येणार; फडणवीसांची घोषणा
संत गाडगे बाबा तीर्थक्षेत्र विकसित करण्यात येणार; फडणवीसांची घोषणा.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणार!
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणार!.
इराण-अमेरिका संघर्षाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना
इराण-अमेरिका संघर्षाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना.
काय महाग, काय स्वस्त? पाहा लाईव्ह अर्थसंकल्प टीव्ही9 मराठीवर
काय महाग, काय स्वस्त? पाहा लाईव्ह अर्थसंकल्प टीव्ही9 मराठीवर.