AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सरकारमध्ये कोणाचा ताळमेळ कोणाला दिसत नाही”; सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची सडकून टीका

राज्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न खाली गेले असल्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून दंग्यांच्या घटना घडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

सरकारमध्ये कोणाचा ताळमेळ कोणाला दिसत नाही; सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची सडकून टीका
| Updated on: Jun 15, 2023 | 4:08 PM
Share

मुंबई : राज्यातील शिवसेना-भाजपच्या सरकारची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. जाहिरातीचा खर्च आणि वर्चस्ववादावरून विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी गटाने सडकून टीका केली होती. महाविकास आघाडीने सरकारवर टीका करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. तर आताही त्याच जाहिरातीच्या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सरकार जाहिरातीमध्ये मश्गुल असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच या सरकारचा कारभारही समाधानकारक नसल्याचे सांगत शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये कोणाचा ताळमेळ कोणाला दिसत नाही अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळेच राज्यात आता कायदा सुव्यवस्थेच्या घटना घडताना दिसत आहेत.

राज्यात अनेक वेळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्यात सरकार आहे की नाही अशीच परिस्थिती असल्याची गंभीर टीकाही त्यांनी यावेळी केली.

मंत्रिमंडळ विस्तार नाही

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांमी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलताना म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार हे काही मंत्रिमंडळ विस्तार करत नाहीत. कारण की, त्यांना माहिती आहे की जर मंत्रिमंडळ विस्तार केला गेला तर हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही असा टोलाही त्यांनी या सरकारला लगावला आहे.

जोरदार फिल्डिंग

आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे जागा वाटपावरूनही तू तू मैं मै सुरु आहे. त्यावरूनही पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवेसना-भाजपवर टीका केली आहे. कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी प्रत्येक जागेवरती दावा केलेला दाखवायला मिळतो.

महाविकास आघाडीत संगनमत

पण महाविकास आघाडी ही संगमताने एकत्र येऊन भाजपला आव्हान देईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. आणि जागावाटप त्या पद्धतीने होईल अशी मला अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्रातील चित्र आपल्याला बदललेलं पाहायला मिळेल असा विश्वासही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

कर्जच्या व्याजावरचा डोंगर

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मणिपूरसारख्या घटनेवर पंतप्रधान काही बोलत नाहीत. तर कर्जच्या व्याजावरचा डोंगर वाढला आहे तर आर्थिक विकास कसा होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न खाली गेले असल्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून दंग्यांच्या घटना घडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...