AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सरकारमध्ये कोणाचा ताळमेळ कोणाला दिसत नाही”; सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची सडकून टीका

राज्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न खाली गेले असल्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून दंग्यांच्या घटना घडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

सरकारमध्ये कोणाचा ताळमेळ कोणाला दिसत नाही; सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची सडकून टीका
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 15, 2023 | 4:08 PM
Share

मुंबई : राज्यातील शिवसेना-भाजपच्या सरकारची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. जाहिरातीचा खर्च आणि वर्चस्ववादावरून विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी गटाने सडकून टीका केली होती. महाविकास आघाडीने सरकारवर टीका करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. तर आताही त्याच जाहिरातीच्या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सरकार जाहिरातीमध्ये मश्गुल असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच या सरकारचा कारभारही समाधानकारक नसल्याचे सांगत शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये कोणाचा ताळमेळ कोणाला दिसत नाही अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळेच राज्यात आता कायदा सुव्यवस्थेच्या घटना घडताना दिसत आहेत.

राज्यात अनेक वेळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्यात सरकार आहे की नाही अशीच परिस्थिती असल्याची गंभीर टीकाही त्यांनी यावेळी केली.

मंत्रिमंडळ विस्तार नाही

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांमी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलताना म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार हे काही मंत्रिमंडळ विस्तार करत नाहीत. कारण की, त्यांना माहिती आहे की जर मंत्रिमंडळ विस्तार केला गेला तर हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही असा टोलाही त्यांनी या सरकारला लगावला आहे.

जोरदार फिल्डिंग

आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे जागा वाटपावरूनही तू तू मैं मै सुरु आहे. त्यावरूनही पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवेसना-भाजपवर टीका केली आहे. कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी प्रत्येक जागेवरती दावा केलेला दाखवायला मिळतो.

महाविकास आघाडीत संगनमत

पण महाविकास आघाडी ही संगमताने एकत्र येऊन भाजपला आव्हान देईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. आणि जागावाटप त्या पद्धतीने होईल अशी मला अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्रातील चित्र आपल्याला बदललेलं पाहायला मिळेल असा विश्वासही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

कर्जच्या व्याजावरचा डोंगर

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मणिपूरसारख्या घटनेवर पंतप्रधान काही बोलत नाहीत. तर कर्जच्या व्याजावरचा डोंगर वाढला आहे तर आर्थिक विकास कसा होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न खाली गेले असल्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून दंग्यांच्या घटना घडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

Follow Us
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?