AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विंग कमांडर अभिनंदन यांची मुक्तता झाली नसती तर पाकिस्तानची पूर्ण ब्रिगेड उद्ध्वस्त केली असती!, भारतीय वायूसेना होती सज्ज

भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनेच विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका केल्याचा खुलासा खुद्द पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे. त्यावर भारताचे माजी वायूसेना प्रमुख बी. एस. धनोआ यांची प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे अभिनंदची सुटका केली नसती तर त्यांची पूर्ण ब्रिगेड उद्ध्वस्थ केली असती, असं धनोआ म्हणाले.

विंग कमांडर अभिनंदन यांची मुक्तता झाली नसती तर पाकिस्तानची पूर्ण ब्रिगेड उद्ध्वस्त केली असती!, भारतीय वायूसेना होती सज्ज
| Updated on: Oct 29, 2020 | 4:57 PM
Share

नवी दिल्ली: भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीने मुक्त केलं, असा खुलासा स्वत: पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे. पाकिस्तानच्या संसदेतच ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी हा खुलासा केला आहे. यावर भारताचे तत्कालीन वायूसेना प्रमुख बी. एस. धनोआ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “त्यावेळी भारतीय सैन्य खूप अॅग्रेसिव्ह होतं. आम्ही त्यावेळी अशा स्थितीत होतो की पाकिस्तानने जर विंग कमांडर अभिनंदन यांना सोडलं नसतं तर आम्ही त्यांची पूर्ण ब्रिगेड उद्ध्वस्त केली असती. ही बाब पाकिस्तानही जाणून होता”, असं धनोआ म्हणाले. (former Indian air force chief B S Dhanoa on wing commander Abhinandan and Pakistan)

माजी वायूसेना प्रमुख बी. एस. धनोआ यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडिलांसोबत काम केलं आहे. अभिनंदनच्या वडिलांना मी वचन दिलं होतं, की आम्ही त्याला परत आणू, असं धनोआ यांनी सांगितलं. 1999 मध्ये पाकिस्ताननं भारताला धोका दिला होता. त्यामुळं आम्ही सुरुवातीपासूनच सतर्क होतो, असंही धनोआ म्हणाले.

हल्ल्याच्या भीतीनेच पाकिस्तानकडून अभिनंदन यांची सुटका

‘विंग कमांडर अभिनंदन यांना भारताबद्दल असणाऱ्या भीतीपोटी सोडण्यात आलं. पाकिस्तानी सरकारच्या मनात भारताबद्दल अशी काही भीती होती, की त्यांनी कुठलाही वेळ वाया न घालवता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना तत्काळ मुक्त केलं आणि भारतासमोर गुडघे टेकले. भारताला खूश करण्यासाठी अभिनंदन यांना सोडण्यात आलं’, अशी कबुलीच पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानी संसदेत दिली आहे.

पाकिस्तानमधील खासदार अयाज सादिक यांनी तर पाकिस्तानी सैन्य प्रमुखांची झालेली हालत बोलून दाखवली. “त्यावेळी पाकिस्तानी सरकारच्या मनात भारत हल्ला तर करणार नाही ना, अशी भीती होती. भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानचे तत्कालीन सेनाप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय कापत होते. त्यांना प्रचंड घाम फुटला होता. बाजवा यांना भारताकडून होणाऱ्या हल्ल्याची मोठी भीती वाटत होती”, अशा शब्दात अयाज सादिक यांनी पाकिस्तानच्या मनातील त्यावेळची भीती बोलून दाखवली.

संबंधित बातम्या:

ढाण्या वाघाची ग्रँड एण्ट्री! विंग कमांडर अभिनंदन पिस्तुलसह मायभूमीत!

वायूदल प्रमुखांसोबत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पुन्हा भरारी

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जैशचा म्होरक्या मसूद अजहरला आानंदाच्या उकळ्या, ऑडिओ टेप जारी

former Indian air force chief B S Dhanoa on wing commander Abhinandan and Pakistan

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.