जगभरात राहणाऱ्या भारतीयांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय! पासपोर्टबाबत बदलला हा नियम

आता केवळ 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना ओसीआय कार्डधारक म्हणून नोंदणी केली जाईल. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नियमांमध्ये हा बदल ओसीआय कार्डधारकांच्या सोयी लक्षात घेऊन करण्यात आला आहे. (Government takes big decision for Indians around the world! This rule has changed regarding passports)

जगभरात राहणाऱ्या भारतीयांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय! पासपोर्टबाबत बदलला हा नियम
जगभरात राहणाऱ्या भारतीयांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय!
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 3:34 PM

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (OCI) कार्ड देण्याच्या नियमात बदल केला आहे. नवीन नियमांतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने वयाचे 20 वर्षे ओलांडले असेल तर त्यास फ्रेश पासपोर्टनंतर नवीन कार्ड देण्याची आवश्यकता नाही. आतापर्यंत वयाच्या 20 वर्षानंतर नवीन पासपोर्ट जारी झाल्यानंतर ओसीआय कार्ड देखील दिले जात होते. वयाच्या 50 व्या वर्षानंतर पुन्हा एकदा नवीन ओसीआय कार्ड तयार करावे लागते. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नियमांमध्ये हा बदल ओसीआय कार्डधारकांच्या सोयी लक्षात घेऊन करण्यात आला आहे. (Government takes big decision for Indians around the world! This rule has changed regarding passports)

20 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना दिले जाईल ओसीआय कार्ड

या अधिकाऱ्याने सांगितले की, आता केवळ 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना ओसीआय कार्डधारक म्हणून नोंदणी केली जाईल. जे केवळ नवीन पासपोर्ट बनवितात त्यांनाच हे दिले जाईल जेणेकरुन त्यांच्या फेशियल फिचर्सचा त्यात समावेश असेल.

ओसीआय पोर्टलवर माहिती अपलोड करावी लागेल

नवीन नियमात नमूद केले आहे की 20 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना नवीन पासपोर्ट जितक्या वेळा दिले जाईल, तितक्या वेळा त्यांना ओसीआय पोर्टलवर या नवीन कागदपत्राची एक प्रत आणि नवीन फोटो अपलोड करावा लागेल. वयाची 20 वर्षे ओलांडल्यानंतर नवीन पासपोर्ट दिल्यानंतरही या प्रक्रियेचे पालन केले जाणार नाही. पासपोर्ट आणि छायाचित्र वयाच्या 50 वर्षानंतर अपडेट केले जाईल. नवीन पासपोर्ट जारी झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत ही कागदपत्रे ओसीआय पोर्टलवर अपलोड करावी लागतील.

कधीपर्यंत भारतात प्रवास करण्यास बंधन नाही?

ओसीआय पोर्टलवर कागदपत्र अपडेट झाल्यानंतर, कार्डधारकास त्यांच्या ई-मेलवर एक पावती पाठविली जाईल. नवीन पासपोर्ट जारी करण्यापासून ते फोटो व कागदपत्रांच्या अपडेटच्या मंजुरीपर्यंत भारतात येण्या-जाण्यासाठी किंवा प्रवासासाठी कोणतेही बंधन नाही.

ओसीआय म्हणजे काय?

घटनेनुसार भारतीयांना दुहेरी नागरिकत्व मिळू शकते. परंतु नागरिकत्व कायदा 1955 च्या कलम 7B मध्ये विशिष्ट प्रकारच्या गटाला काही सुविधा उपलब्ध आहेत, या विशिष्ट गटाला ओसीआय ओव्हरसीज सिटीझन्स ऑफ इंडिया कार्डधारक म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर ओसीआय कार्डधारक भारतीय वंशाची व्यक्ती असते. ज्याने दुसर्‍या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. ओसीआय कार्डधारक सर्व देशांसाठी वैध आहे. पाकिस्तान व बांगलादेशचे नागरिकत्व मिळवलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना ही सुविधा मिळत नाही.

NRI आणि OCI मध्ये काय फरक आहे?

– जेव्हा एखादी व्यक्ती आर्थिक वर्षात कमीत कमी 183 दिवस परदेशात राहते तेव्हा त्याला एनआरआय अर्थात एनआरआय म्हटले जाते. ओसीआय(OCI) कार्ड धारक हे भारताचा नागरिक नसतो तर अनिवासी भारतीय(NRI) हा भारताचा नागरिक असतो.

– ओसीआय कार्डधारकास भारतात मतदान करण्याचा अधिकार नाही. अनिवासी भारतीयांना मत देण्याचा अधिकार आहे. ओसीआय कार्डधारक कोणत्याही निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही. एनआरआय घेऊ शकतो.

– ओसीआय कार्डधारक कोणतीही शेतीची जमीन खरेदी करु शकत नाही. अनिवासी भारतीय शेतजमीन खरेदी करु शकतात, तर ओसीआय कार्डधारकाकडे पासपोर्ट नसतो, तर अनिवासी भारतीय पासपोर्ट असतो. (Government takes big decision for Indians around the world! This rule has changed regarding passports)

इतर बातम्या

Shanidev | शनिदेवाला तेल का अर्पण करतात? जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा…

रेमडेसिव्हीर जीवनरक्षक औषध नाही, उपलब्ध नसल्यास पर्याय काय? डॉक्टर अमोल कोल्हे यांचा खास व्हिडीओ

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.