West Bengal Suicide | सुहागरात साजरा करताच नवरदेवाची गळफास घेऊन आत्महत्या, नेमकं काय घडलं ज्याने पश्चिम बंगाल हादरलं

प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल. सध्या तरी वराच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. कुटुंबासोबतच नववधूही विचार करत आहे की, हनिमूनला असे काय घडले, ज्यामुळे वराने आपले जीवन संपवले.

West Bengal Suicide | सुहागरात साजरा करताच नवरदेवाची गळफास घेऊन आत्महत्या, नेमकं काय घडलं ज्याने पश्चिम बंगाल हादरलं
आत्महत्या प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 4:11 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. नवविवाहित जोडप्याने रात्री सुहागरात साजरी केल्यानंतर सकाळी नवरदेवाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हावडा येथील शालीमार परिसरात शनिवारी घडली आहे. मात्र नवरदेवाने अचानक असे का केले याचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. नववधू आणि कुटुंबीयांनाही या घटनेमुळे धक्का बसला आहे.

नेमकं काय घडलं?

हावडा येथील बी गार्डन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शालीमार परिसरात मयत नवरदेव आपल्या कुटुंबासोबत राहतो. मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात त्याचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर प्रत्येक जोडप्याला ज्या क्षणाची उत्सुकता असते ती म्हणजे सुहागरात. दोघा पती-पत्नीने आपल्या सुहागरातचा आनंदही लुटला. त्यानंतर सकाळी नवरदेवाने आपल्या पत्नीला अंघोळ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पत्नी अंघोळीसाठी गेली. जवळपास अर्ध्या तासाने पत्नी अंघोळ करुन आपल्या खोलीत आली तर पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. हे पाहून पत्नीला धक्काच बसला.

पोलीस घटनेची चौकशी करीत आहेत

घटनेची माहिती मिळताच बी गार्डन पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल. सध्या तरी वराच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. कुटुंबासोबतच नववधूही विचार करत आहे की, सुहागरातच्या रात्री असे काय घडले, ज्यामुळे वराने आपले जीवन संपवले. यावरून पोलीस कुटुंबीयांची चौकशीही करत आहेत. लवकरच या घटनेचा छडा लावला जाईल. शेजारी आणि नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सोपवण्यात येणार आहे. अनेक बाबी लक्षात घेऊन पोलीस तपास करत आहेत.

दोघांच्या संमतीने झाला होता विवाह

7 डिसेंबर रोजी शालीमार येथे राहणाऱ्या आदर्श साओ (24) याचे बराकपूर येथील एका मुलीसोबत थाटामाटात लग्न झाले होते. दोघांच्या संमतीने हे लग्न ठरल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 8 डिसेंबर रोजी वधू सासरच्या घरी पोहोचली. गुरुवारी मधुचंद्र आणि शुक्रवारी रात्री बहू-भातचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी दोघांनाही जाग आली. वराने वधूला आंघोळ करण्यास सांगितले, सुमारे अर्ध्या तासानंतर ती आंघोळ करून खोलीत आली असता तिचा नवरा फासावर लटकत असल्याचे दिसले. हे पाहून घरात एकच आरडाओरडा झाला.

वधूने सांगितले की, लग्न ठरल्यानंतर दोघेही गेल्या सहा महिन्यांपासून संपर्कात होते आणि रोज फोनवर बोलत होते. आम्ही दोघेही लग्नाची आतुरतेने वाट पाहत होतो. सगळं व्यवस्थित चाललं होतं. शुक्रवारी सकाळी त्याने मला आंघोळीसाठी पाठवले. अर्ध्या तासानंतर मी खोलीत आले तेव्हा त्याने शालीच्या सहाय्याने फास लावून घेतला होता. (Groom suicide by hanging after marriage in west bengal)

इतर बातम्या

Nagpur Suicide | विषारी इंजेक्शन टोचून डॉक्टर महिलेने स्वतःला संपविले, सुसाईट नोटमध्ये लिहिले आत्महत्येचे कारण

बलात्कारापासून वाचण्यासाठी चौथ्या मजल्यावरून उडी; तरीही आरोपीने सोडला नाही पाठलाग, चाकू हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.