AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लग्नाआधी मुलगा-मुलीची रक्त-कुंडली जुळायला हवी’, केद्रीय आरोग्यमंत्री असं का म्हणाले?

हिंदू धर्मात लग्न करताना मुलगा आणि मुलीची कुंडली बघितली जाते (Health Minister Harsh Vardhan on thalassemia).

'लग्नाआधी मुलगा-मुलीची रक्त-कुंडली जुळायला हवी', केद्रीय आरोग्यमंत्री असं का म्हणाले?
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन
| Updated on: Mar 20, 2021 | 2:52 PM
Share

नवी दिल्ली : हिंदू धर्मात लग्न करताना मुलगा आणि मुलीची कुंडली बघितली जाते. त्यांचे 36 पैकी किती गुण जुळतात याचा अभ्यास केला जातो. मात्र, या कुंडलीसोबतच मुलगा आणि मुलीची रक्त-कुंडली देखील तपासली जावी, त्यांच्या रक्ताचीदेखील चाचणी केली जावी, असं मत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत मांडलं. लोकसभेत खासदार मनोज कोटक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन यांनी ही बाब सांगितली. विशेष म्हणजे लग्नापूर्वी मुलगा आणि मुलीची रक्त-कुंडली तपासली जावी, यासाठी मोहिम राबवावी लागेल, असंदेखील ते यावेळी म्हणाले (Health Minister Harsh Vardhan on thalassemia).

लग्नाआधी रक्त-कुंडली बघून युवक आणि युवतीला योग्य आरोग्य सल्ला दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे त्यातून संबंधित जोडप्याचं होणारं बाळ थॅलेसीमिया वाहक होऊ नये. त्यामुळे लग्नाआधी रक्त-कुंडली बघणं हे समाजासाठी आणि आजार संपवण्यासाठी महत्त्वाचं ठरेल. दरवर्षी 8 मे रोजी थॅलेसीमिया आजार साजरा केला जातो.

देशात दरवर्षी 10 हजार बालक थॅलेसीमिया बाधित जन्माला येतात

देशात दरवर्षी दहा हजार थॅलेसीमिया बाधित बालकं जन्माला येतात. त्यामुळे लग्नाआधी थॅलेसीमिया टेस्ट व्हावी, असं तज्ज्ञ म्हणतात. थॅलेसीमियाबाबत लोकांमध्ये जागरुकता होणं जरुरीचं आहे. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता नसल्याने रुग्णावर पुरेसा उपचार होत नाही. देशात दरवर्षी हजारो थॅलेसीमिया बाधितांचा मृत्यू होतो. त्यामुळे लग्माआधी थॅलेसीमिया चाचणी करावी, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.

थॅलेसीमिया हा नेमका आजार काय?

थॅलेसीमिया हा रक्ताचा आजार आहे. या आजारामुळे शरीरातील ब्लड सेल्स कमजोर होतात. काही लोकांमध्ये जीन्स वेरिअंट्स नसल्याने या आजाराची लागण होते. या आजारात हिमोग्लोबिन प्रोटीन बनवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. हिमोग्लोबिनच्या माध्यमातूनच रेड ब्लड सेल्सला ऑक्सिजन पोहोचतो.

आई किंवा वडील या दोघांपैकी कुणीही एकाला जरी हा आजार असला तर हा आजार मुलाला देखील होण्याची शक्यता असते. थॅलेसीमिया बाधित बालकांना एका विशिष्ट ठरलेल्या वेळेत शरीरात नवं रक्त चढवावं लागतं. त्यामुळेच जर आई-वडिलांपैकी कुणीही या आजाराने बाधित असेल तर मुलाचा विचार करु नये, असा सल्ला डॉक्टर देतात (Health Minister Harsh Vardhan on thalassemia).

हेही वाचा : हिरेनप्रकरणही एनआयएकडे, सरकारची नामुष्की की वाझेंच्या अडचणीत वाढ?; वाचा, सविस्तर

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.