AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, 4 दिवस धोक्याचेच, खरिपावर टांगती तलवार..!

राज्यात यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असले तरी जुलैच्या 1 तारखेपासून सलग 18 दिवस पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे जून महिना कोरडा गेला असतानाही आता सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्यानंतर 5 दिवस पावसाने उघडीप दिलेली होती. शेती मशगातीच्या कामांना वेग येत असतानाच पुन्हा 23 जुलैपासून पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Monsoon Update : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, 4 दिवस धोक्याचेच, खरिपावर टांगती तलवार..!
राज्यात पावसाचा मुक्काम वाढला
| Updated on: Jul 23, 2022 | 1:52 PM
Share

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून राज्यात (Rain) पावसाचा जोर कमी झाला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस हा सुरुच आहे. असे असले तरी आगामी 4 ते 5 दिवस राज्यात (Heavy Rain) मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज (IMD) हवामान विभागाने वर्तवलेला आहे. 1 जुलैपासून राज्यात सुरु झालेला पाऊस हा 18 जुलैपर्यंत कायम होता. गेल्या 5 दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता तर दुसरीकडे शेती मशागतीच्या कामांनाही वेग आला होता. आता 23 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागात वरुणराजाची हजेरी राहणार आहे. त्यामुळे पावसाचा धोका कायम असून नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे अवाहन करण्यात आले आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

राज्यात गेल्या पाच दिवसांमध्ये तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली असली तरी 23 जुलैपासून पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. मध्यम ते जोरदार असे या पावसाचे स्वरुप राहणार आहे. रविवारी अधिकचा तर सोमवारपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सर्वाधिक पाऊस हा कोकणात बरसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

5 दिवसाची उघडीप

राज्यात यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असले तरी जुलैच्या 1 तारखेपासून सलग 18 दिवस पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे जून महिना कोरडा गेला असतानाही आता सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्यानंतर 5 दिवस पावसाने उघडीप दिलेली होती. शेती मशगातीच्या कामांना वेग येत असतानाच पुन्हा 23 जुलैपासून पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शिवाय जिल्हा प्रशासनादेखील सतर्क रहावे लागणार आहे. आगोदरच धरणे ओव्हरफ्लो झालेली आहेत. यातच आता मुसळधार पाऊस झाला तर धोका निर्माण होणार आहे.

खरिपावरील धोका कायम

खरीप हंगामातील पेरणी होताच राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस तर झालाच पण पेरणी क्षेत्रात पावसाचे पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकासान झाले आहे. आता कुठे मशागतीच्या कामांना वेग आला होता. असे असतानाच पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. आता पावसामध्ये सातत्य राहिले तर उत्पादनात घट ही निश्चित मानली जात आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.