AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या दिल्लीमधील आंदोलनावर हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?

भाजपच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिल्लीमधील CJP च्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाल्या हेमा मालिनी?

'कॉकरोच जनता पार्टी'च्या दिल्लीमधील आंदोलनावर हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
| Updated on: Jul 21, 2026 | 12:34 PM
Share

‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने सोमवारी नवी दिल्लीत मोठे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि युवक सहभागी झाले. आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्की तसेच झटापट झाल्याची माहिती समोर आली असून, यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी झाले असल्याची बातमी समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आंदोलनाचा मार्ग योग्य नसल्याचे सांगत, कोणतीही समस्या संवाद आणि चर्चेतून सोडवावी असे मत व्यक्त केले.

‘आंदोलनाऐवजी चर्चेला प्राधान्य द्या’

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, ‘जर काही समस्या असेल तर ती योग्य पद्धतीने चर्चेतून मांडली पाहिजे. अशा प्रकारे रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने कोणताही प्रश्न सुटणार नाही. देशातील युवक आणि शिक्षण व्यवस्थेसाठी मोदी सरकारने सातत्याने काम केले आहे. त्यामुळे अशा आंदोलनाला काही अर्थ नाही.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘प्रश्नांचे समाधान संवादातूनच होऊ शकते. विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी करून घेताना त्यांची दिशाभूल होता कामा नये. त्यांना नेमकी समस्या काय आहे हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.’

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत मौन

हेमा मालिनी यांना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या मुद्द्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सीजेपीची प्रमुख मागणी काय?

सीजेपीकडून नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी सातत्याने मागणी केली जात आहे. या मागण्यांसाठी पक्षाने 20 जुलै रोजी ‘संसद मार्च’चे आवाहन केले होते.

या आंदोलनासाठी दिल्लीसह देशभरातील विविध राज्यांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि युवक राजधानीत दाखल झाले. आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केला.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात