AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेयसीसोबत लग्न झालं नाही म्हणून…; कंगना रनौतचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा

BJP Candidate Kangana Ranut on Rahul Gandhi Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अशात विविध नेते राजकीय बाबींवर विधानं करत आहेत. भाजपची उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रनौतने एक मोठं विधान केलं आहे. तिच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.

प्रेयसीसोबत लग्न झालं नाही म्हणून...; कंगना रनौतचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 06, 2024 | 1:06 PM
Share

अभिनेत्री कंगना रनौत… कंगना एखादं वक्तव्य करते अन् त्याची बॉलिवूडसह राजकीय वर्तुळातही चर्चा होते. एका मुलाखतीदरम्यान कंगना रनौतने गांधी परिवाराबाबत एक वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. कंगनाने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली आहे. परिस्थितीमुळे या दोघांना राजकारणात यावं लागलं, असं कंगना म्हणाली आहे. राहुल गांधी यांना त्यांच्या आईच्या सांगण्यावरून राजकारणात यावं लागलं, असं कंगना म्हणाली आहे. या शिवाय राहुल गांधी यांच्या वैयक्तिक जीवनावरही कंगनाने भाष्य केलं आहे.

राहुल गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिपण्णी

मी असं ऐकून आहे की, राहुल गांधी हे एका महिलेवर प्रेम करतात. पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. राहुल गांधी यांना ना कौटुंबिक सुख मिळतंय. ना त्यांचं राजकीय करिअर चांगलं आहे. त्यांच्यावर कुटुंबाचा दबाव आहे. त्यामुळे ते राजकारणात आहेत. बॉलिवूडमध्येही असे काही लोक आहेत. ज्यांना जबरदस्तीने अभिनय क्षेत्रात काम करायला लागत आहे. तशीच अवस्था राहुल आणि प्रियांका गांधी यांची आहे, असं कंगना म्हणाली .

राहुल गांधी हे महत्वकांक्षी आईचे पुत्र आहेत. ते परिस्थितीचे शिकार झाले आहेत. राजकारणाच्या पलिकडं ते खूप काहीतरी चांगलं करू शकत होते. मात्र परिस्थितीमुळे त्यांना राजकारणात यावं लागलं आहे. आईच्या दबावामुळे राहुल गांधी राजकारणात आले खरे, पण ते यशस्वी होत नाहीयेत, असं म्हणत कंगनाने सोनिया गांधी यांच्यावर आरोप केले आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केलं आहे.

“प्रियांका-राहुल परिस्थितीचे शिकार”

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे परिस्थितीचे शिकार झाले आहेत. राहुल आणि प्रियांका हे दोघेही चांगली मुलं आहेत. पण त्यांच्या आई त्यांना त्रास देते. या दोघांचंही राजकारणात काहीही भविष्य नाही. आताही वेळ गेलेली नाही. या दोघांनी त्यांच्या आईने त्यांना काही चांगलं करू दिलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांना टॉर्चर नाही केलं पाहिजे, असं कंगना म्हणाली.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.