AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतानं ऑपरेश सिंदूर कसं राबवलं? जाणून घ्या A टू Z माहिती

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, भारताच्या या कारवाईमुळे दहशतवादाचं कंबरडं मोडलं आहे.

भारतानं ऑपरेश सिंदूर कसं राबवलं? जाणून घ्या A टू Z माहिती
| Updated on: May 13, 2025 | 7:18 PM
Share

22 एप्रिलला पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.  या हल्ल्यामागे धार्मिक हिंसाचार भडकवण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश स्पष्टपणे दिसून येतो.  या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली.

भारतानं सर्वात आधी सिंदू नदी जल कराराला स्थगिती दिली, त्यानंतर अटारी बॉर्डर बंद करण्यात आली, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द करण्यात आले, त्यांना देश सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला, तसेच भारताकडून आयात -निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली, पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीमध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला. भारताकडून सुरू असलेल्या या कारवाईमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला, पाकिस्तानच्या नेत्यांकडून युद्धाच्या पोकळ धमक्या देणं या काळात सुरू होतं. तर दुसरीकडे भारतानं दहशतवादाविरोधात मोठा निर्णय घेतला, ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं.

सहा मे रोजी सायंकाळी भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानमधील दहशतवादाचं कंबरडं मोडलं, पाकिस्तानमधील नागरिक अथवा सैन्य तळ यांना धक्का न लावता अचूक पणे फक्त दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणे, दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणे हाच उद्देश या ऑपरेशन सिंदूरमागे भारताचा होता, भारतानं ऑपरेश सिंदूर यशस्वीपणे राबवलं. भारतानं ऑपरेशन सिंदूर आधी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे अचूकपणे हेरले, आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली.

दरम्यान ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरल्यानंतर भारतीय लष्कराची सात मे रोजी एक पत्रकार परिषद देखील पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूरचा नेमका काय उद्देश होता हे स्पष्ट करण्यात आलं, भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली, तसेच भारत कोणत्याही भागामध्ये हल्ला करण्यास सक्षम आहे हे देखील पाकिस्तानला कळून चुकलं.  भारतानं पाकिस्तानी नागरिक किंवा सैन्याला धक्क न लावता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अचूकपणे फक्त दहशतवादी अड्ड्यांचा वेध घेतला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.