AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाऊस किती पडतो हे नक्की मोजतात कसं? वाचा वैज्ञानिक पद्धती

पावसाळा सुरू झाला की, रोजच्या हवामान अहवालात आपण वाचतो "आज 8 इंच पावसाची नोंद", "45 मिमी पाऊस पडला". पण हे आकडे नेमके कुठून आणि कसे येतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हवामान विभागाला इतक्या अचूकतेनं पावसाचं मोजमाप कसं करता येतं, हे खरंतर विज्ञानाचं अद्भुत उदाहरण आहे.

पाऊस किती पडतो हे नक्की मोजतात कसं? वाचा वैज्ञानिक पद्धती
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 25, 2025 | 11:44 PM
Share

सध्या महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत जोरदार पावसाचा कहर सुरु आहे. नद्या-नाले भरून वाहत आहेत, आणि हवामान विभाग सतत पावसाच्या आकड्यांची नोंद देत आहे. तुम्हीही वारंवार ऐकता “६ इंच पाऊस पडला”, “५० मिमी पावसाची नोंद झाली” वगैरे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पावसाचं प्रमाण इतकं अचूकपणे मोजलं जातं तरी कसं? हवामान विभाग यासाठी कोणती यंत्रणा वापरतो? याचं उत्तर आहे वैज्ञानिक आणि अत्याधुनिक पद्धतीने वापरली जाणारी वर्षामापन यंत्रणं.

हवामान वैज्ञानिकांच्या नुसार, जगभरात पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी जवळपास एकसारखी उपकरणं वापरली जातात आणि भारतातही याच मानक उपकरणांचा उपयोग केला जातो. आजच्या घडीला भारतात पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी तीन प्रमुख प्रकारची यंत्रं वापरली जातात :

1. साधारण वर्षामापन यंत्र (Ordinary Rain Gauge)

हे पारंपरिक यंत्र हवामान वेधशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. यामध्ये एक टाकी (फनेल) असते, जिच्यातून पावसाचे थेंब एका कलेक्शन जारमध्ये गोळा होतात. हा जार सुमारे 400 मिलीलीटर क्षमतेचा असतो. यामध्ये जमा झालेलं पाणी एक परखनळीच्या साहाय्याने मोजलं जातं. दिवसातून तीन वेळा नोंद घेण्यात येते, ज्यावरून त्या परिसरातील २४ तासांत पडलेला पाऊस नोंदवला जातो.

2. स्वयंचलित वर्षामापन यंत्र (Self-recording Rain Gauge)

हे यंत्र अधिक अद्ययावत असून, यामध्ये देखील पावसाचे थेंब फनेलमधून एका ड्रममध्ये जमा होतात. मात्र, यामध्ये एक घड्याळ प्रणाली (क्लॉक ड्रम) आणि सुई असते, जी एक ग्राफ काढते. या ग्राफच्या साहाय्याने पावसाचं प्रमाण आणि कालावधी दोन्ही आपोआप मोजलं जातं. म्हणजेच, पावसाचा प्रत्येक टप्पा आणि त्याची तीव्रता वेळेनुसार रेकॉर्ड होते.

3. टिपिंग बकेट वर्षामापन यंत्र (Tipping Bucket Rain Gauge)

ही यंत्रणा पूर्णतः ऑटोमेटेड असून, त्यामध्ये फनेलद्वारे पावसाचे थेंब एका बकेटमध्ये जमा होतात. ठरावीक पाण्याचं प्रमाण जमा झालं की बकेट झुकतं आणि प्रत्येक वेळेस एक टिपची नोंद होते. ही माहिती इलेक्ट्रॉनिक डाटा लॉगरकडे पाठवली जाते. यंत्र दर १५ मिनिटांनी पावसाची आकडेवारी अपडेट करतं. यामुळे जवळपास थेट थेंबागणिक माहिती मिळते.

या अत्याधुनिक यंत्रांच्या मदतीने हवामान विभाग देशभरात विविध ठिकाणी पावसाचं नेमकं प्रमाण मोजतो आणि हवामान अंदाज देतो. हे आकडे शेती, पूर नियंत्रण, जलसाठा नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. पावसाची मोजणी हा केवळ आकड्यांचा खेळ नसून त्यामागे वैज्ञानिक परिश्रम आणि अचूक डेटा संकलनाचं महत्त्व असतं.

या माहितीचा उपयोग काय?

पावसाचं प्रमाण मोजणं म्हणजे अंदाज नाही, तर पूर्णपणे अचूक विज्ञान आहे. हवामान विभागाच्या प्रयत्नांमुळेच आपल्याला हवामानाशी संबंधित योग्य आणि वेळेवर माहिती मिळते, जी शेतीपासून आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी महत्त्वाची असते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.