AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : महाराष्ट्रात यंदा पावसाचं प्रमाण कसं राहणार? IMD चा थरकाप उडवणारा पहिला अंदाज, घाम फोडणारी बातमी

IMD Monsoon Update 2026 भारत हा कृषीप्रधान देश आहे. मान्सूनचं प्रमाण कसं राहणार? यावरच शेतीचं भवित्यव्य अवलंबून असतं. दरम्यान यंदा देशासह महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कसं राहणार? याचा पहिला अंदाज आयएमडीकडून समोर आला आहे.

Monsoon Update : महाराष्ट्रात यंदा पावसाचं प्रमाण कसं राहणार? IMD चा थरकाप उडवणारा पहिला अंदाज, घाम फोडणारी बातमी
IMD Monsoon Update Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 18, 2026 | 5:14 PM
Share

भारत हा कृषीप्रधान देश आहे. परंतु भारतामधील जवळपास 70 ते 80 टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे देशात मान्सूनचं प्रमाण कसं राहतं, त्यावर शेतीचं भवितव्य अवलंबून असतं. गेल्या वर्षी देशासह राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली यामुळे शेतीला मोठा फटका बसला. शेतीसह अनेक गावांवर देखील पुराच्या पाण्यामुळे स्थलांतरणाची वेळ आली होती. तर काही वर्षी देशात पावसाचं प्रमाण हे अत्यल्प राहतं, त्याचा देशील शेतीला मोठा फटका बसतो. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते. दरम्यान यंदा देशात पावसाचं प्रमाण कसं राहणार? मान्सूनची एन्ट्री कधी होणार याबाबत भारतीय हवामान विभाग (IMD) चा पहिला अंदाज समोर आला आहे. या अंदाजामुळे झोप उडाली आहे.

यावर्षी मान्सूनवर ‘अल निनोचा’ प्रभाव राहील असं भाकीत भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे. मान्सूनवरील अल निनोच्या प्रभावामुळे हवामान विभागाकडून देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यंदा मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार असल्यानं सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रशांत महासागरच्या काही भागामध्ये अल निनो तयार होत आहे. याचा परिणाम म्हणजे सध्या देशभरात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे 41 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलं आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. याचा फटका हा मान्सूनला बसण्याची शक्यता आहे.

काय आहे भारतीय हवामान विभागाचा अंदाज?

भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार यावर्षीच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार असून, जून ते सप्टेंबर या काळात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरच्या काही भागामध्ये अल निनो तयार होत आहे. ज्याचा फटका हा केवळ भारतालाच नाही बसणार तर जगभरातील अनेक देशांना बसू शकतो असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील यंदा पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.