AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hariyana Suicide : हरियाणात पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

सुशील आणि त्याची पत्नी शीला हे दोघे काही वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर दोघेही शीलाच्या आईच्या घरी राहत होते. पत्नी आणि सासू दररोज सुशीलकडे पैशांची मागणी करायच्या. पैसे दिले नाही तर दोघीही त्याला वारंवार धमकावत असत, अशी माहिती सुशीलचा भाऊ समशेरने दिली.

Hariyana Suicide : हरियाणात पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
हरियाणात पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 6:23 PM
Share

भिवानी : पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पती (Husband)ने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना हरियाणातील भिवानी येथे घडली आहे. सुशील (44) आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुशीलने सुसाईड नोट (Suicide Note) लिहिली होती. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दखल करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पत्नी आणि सासूच्या दररोजच्या मागण्या आणि धमक्यांना कंटाळून सुशीलने आपल्या मूळ गावी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. (In Haryana, man committed suicide after being harassed by his wife and mother-in-law)

पत्नी आणि सासू दररोज पैशाची मागणी करायच्या

सुशील आणि त्याची पत्नी शीला हे दोघे काही वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर दोघेही शीलाच्या आईच्या घरी राहत होते. पत्नी आणि सासू दररोज सुशीलकडे पैशांची मागणी करायच्या. पैसे दिले नाही तर दोघीही त्याला वारंवार धमकावत असत, अशी माहिती सुशीलचा भाऊ समशेरने दिली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह आणि सुसाईड नोट ताब्यात घेतले. सुसाईड नोट आणि नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. सध्या याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिस तपासानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले.

भंडाऱ्यात शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पिपरी चुन्नी येथील शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रामदयाल पटले (45) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी स्वतःच्या शेतात झाडाला दोरी बांधून गळफास लावला. सकाळी शेजारचा शेतकरी शेतावर गेले असताना त्याला रामदयाल यांचा मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना याची माहिती देत सिहोरा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविला. तर रामदयाल यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. (In Haryana, man committed suicide after being harassed by his wife and mother-in-law)

इतर बातम्या

VIDEO : अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून अंडापावच्या गाडीवर फ्रीस्टाईल हाणामारी, घटना सीसीटीव्हीत झाली कैद

Video Gadchiroli accident | गडचिरोलीत ट्रकची स्कूल व्हॅनला धडक, दहापैकी चार विद्यार्थी गंभीर जखमी

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.