AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक तोळा सोनं 90 रुपये, 12 पैशांना लिटरभर दूध, 1950 साली भारतात कसे जगायचे लोक? महिन्याचे सामान फक्त…

India 1950 Inflation : 1950 साली भारतात सोनं फक्त 90 रुपये तोळा आणि एक लिटर दूध 12 पैशांना मिळत होतं. त्या काळातील महागाई, जीवनशैली आणि आजच्या दरांशी तुलना जाणून घेऊयात.

एक तोळा सोनं 90 रुपये, 12 पैशांना लिटरभर दूध, 1950 साली भारतात कसे जगायचे लोक? महिन्याचे सामान फक्त...
1950 InflationImage Credit source: AI
| Updated on: May 04, 2026 | 7:08 PM
Share

गेल्या काही काळापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण बाजारात गेलो तर खिसा रिकामा झाला तरी पिशवी भरत नाही. गॅस, भाजीपाला, डाळी, तेल सर्वांचेच दर गगनाला भिडले आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आजपासून सुमारे साडेसात दशकांपूर्वी, म्हणजे 1950 च्या काळात महागाई किती होती? आपल्या आजोबा पंजोबाच्या काळात खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर किती होते? तुम्ही जर आकडा वाचला तर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गगनाला भिडलेल्या किमती

सध्याच्या काळात सामान्य माणसासाठी जेवण तयार करणेही महागले आहे. बाजारात गव्हाचे पीठ 40 ते 45 रुपये किलो, तूर डाळ 150 ते 180 रुपये किलो आणि मोहरीचे तेल 140 ते 160 रुपये लिटर दराने मिळते. तर शुद्ध देशी तूप 600 ते 700 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. भाजीपाला आणि मसाल्यांच्या किमतीही वाढत आहेत. या महागाईमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. मात्र 75 वर्षांपूर्वी ही परिस्थिती वेगळी होती.

1950 च्या काळातील महागाई

1950 साली भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि अर्थव्यवस्था वेगळी होती. त्या काळात रुपयाची किंमत जास्त होती आणि 1 रुपया म्हणजे 16 आणे असे होते. त्या काळी महागाई जवळजवळ नव्हतीच. गव्हाचे पीठ 10 ते 30 पैसे प्रति किलो होते. डाळी 20 ते 25 पैसे प्रति किलो होत्या. तेल 25 ते 30 पैसे प्रति लिटर, शुद्ध देशी तूप 2 ते 5 रुपये प्रति किलोने मिळते होते. तांदूळ सुमारे 12 पैसे प्रति किलो, साखर सुमारे 40 पैसे प्रति किलो, दूध सुमारे 12 पैसे प्रति लिटर, सोने 88 ते 90 रुपये तोळा होते. महिन्याचे सामान 10 ते 12 रुपयांमध्ये मिळत असे.

मातीची चूल आणि साधे जीवन

1950 च्या काळात स्वयंपाकघर खूप साधे आणि नैसर्गिक होते. गॅसऐवजी लोक मातीच्या चुलीवर स्वयंपाक करायचे. इंधनासाठी लाकूड, गोवऱ्या आणि कोळसा वापरला जायचा. भांडी पितळ, तांबे, कांस्य किंवा मातीची असायची. हळूहळू शिजवलेल्या अन्नामुळे चव आणि पौष्टिकता टिकून राहायची. तसेच फ्रिज नसल्यामुळे थंड पाण्यासाठी माठ वापरले जायचे.

Follow Us
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....