AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीर खाली करावं, भारतानं पुन्हा ठणकावलं

भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावलं आहे, पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर खाली करावाच लागेल असं भारतानं म्हटलं आहे.

पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीर खाली करावं, भारतानं पुन्हा ठणकावलं
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: May 13, 2025 | 7:48 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले, या हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, तसेच भारताच्या या कारवाईमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता, अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली, मात्र त्यानंतर अमेरिकेकडून काश्मीरच्या प्रश्नावर देखील भाष्य करण्यात आलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली.

या पत्रकार परिषदेमधून अमेरिकेला इशारा देण्यात आला आहे, तसेच पाकिस्तानला देखील ठणकावण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरबाबतचे प्रश्न हे द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवले जाणार, कुणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नाही असं भारतानं आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे. तसंच पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर खाली करावंच लागणार असंही भारतानं  म्हटलं आहे.

भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अमेरिकेकडून काश्मीरच्या प्रश्नावर देखील भाष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर आज परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये भारतानं पुन्हा एकदा काश्मीरबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर इतरांची मध्यस्थी मान्य नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींमध्ये चर्चा झाली आहे. जम्मू काश्मीरमधील प्रश्न द्विपक्षीय चर्चेनं सोडवले जातील, पाकिस्तानने पीओके खाली करावं, असं भारतानं म्हटलं आहे.

दरम्यान युद्धविरामानंतर अमेरिकेकडून भारत आणि पाकिस्तानसोबतच्या व्यापारावर देखील भाष्य करण्यात आलं होतं. यावर देखील भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत आणि अमेरिकेच्या चर्चेमध्ये व्यापाराचा मुद्दा नव्हता, युद्धविरामामध्ये कुठेही व्यापाराचा मुद्दा नव्हता असं भारताच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. पाकच्या गोळीचं उत्तर गोळीनंच देऊ, असा इशाराही यावेळी भारताकडून पुन्हा एकदा पाकिस्तानला देण्यात आला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.