AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत करणार समुद्रमंथन, 6 किलोमीटर खोल मिशन समुद्रयान, काय आहे ही नवी मोहीम?

भारत आपल्या नव्या मोहीम समुद्रयानमधून समुद्राखाली 6 किलोमीटर खोल समुद्राचा अभ्यास करण्याची योजना आखत आहे. मत्स्य 6000 मशीन शास्त्रज्ञ यांना खोल समुद्रात घेऊन जाईल. या मोहिमेमुळे भारताचा यापूर्वी अशी चाचणी केलेल्या सहा देशाच्या यादीत समावेश होईल.

भारत करणार समुद्रमंथन, 6 किलोमीटर खोल मिशन समुद्रयान, काय आहे ही नवी मोहीम?
samudrayanImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Mar 10, 2024 | 8:26 PM
Share

नवी दिल्ली | 10 मार्च 2024 : चंद्रावरील मोहीम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर भारताने आणखी एका मोठी मोहीम हाती घेतली आहे. भारत आता खोल समुद्राचा अभ्यास करणार आहे. याची सुरवात 2021 पासून सुरु आहे. मात्र, ही मोहीम प्रत्यक्षामध्ये 2025 च्या अखेरीस पूर्णत्वास येणार आहे. भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, 2025 च्या अखेरीस भारताने आपल्या समुद्रयानमध्ये 6 किलोमीटर खोल समुद्राचा अभ्यास करण्यासाठी आपले शास्त्रज्ञ पाठविण्याची तयारी केली आहे.

मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, मत्स्या 6000 या भारतीय पाणबुडीच्या मदतीने मानव समुद्राखाली 6,000 मीटर खोलीपर्यंत जाऊ शकतो. या वर्षाच्या अखेरीस त्याची चाचणी देखील केली जाईल. समुद्रयान हे समुद्राच्या आत 6 किलोमीटर खोलीपर्यंत जाईल. जिथे प्रकाशही पोहोचू शकत नाही त्याठिकाणी हे समुद्रयान पोहोचणार आहे. आमच्या मत्स्या (Matsya 6000) चा संबंध आहे. हे यंत्र मानवांना तेथपर्यंत घेऊन जाईल असे त्यांनी सांगितले.

समुद्रयान प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेतला आहे. या वर्षाच्या अखेरीस शास्त्रज्ञ पहिली उथळ पाण्याची चाचणी घेण्यास सक्षम असतील. समुद्रयान किंवा खोल महासागर मोहीम ही 2021 मध्ये प्रक्षेपित करण्यात आली. या मोहिमेमध्ये मत्स्य 6000 चा वापर करून मध्य हिंद महासागरातील समुद्राच्या तळापर्यंत 6,000 मीटर खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी एक क्रू मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेत तीन जणांचा समावेश असेल असे त्याचे डिझाइन तयार केले आहे अशी माहिती मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

अमेरिका, रशिया आणि चीनच्या श्रेणीत भारत येणार

पाणबुडी वैज्ञानिक सेन्सर्स आणि उपकरणांच्या संचने सुसज्ज असणार आहे. 12 तास इतकी या ऑपरेशनची क्षमता असेल. आपत्कालीन परिस्थितीत याची क्षमता 96 तासांपर्यंत वाढवता येणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि जपान यासारख्या देशांनी खोल समुद्रातील क्रू मिशन यशस्वी केले आहे. या मोहिमेत आपले कौशल्य आणि क्षमता दाखवून भारत या देशांच्या रांगेत सामील होण्यास तयार झाला आहे.

Follow Us
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा