AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारत -पाकिस्तानची युद्धविरामासाठी सहमती, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला होता, या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! भारत -पाकिस्तानची युद्धविरामासाठी सहमती, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 10, 2025 | 6:57 PM
Share

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला होता, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी मोठा दावा केला आहे, भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करण्यात आली, भारतानं सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिली होती, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले होते, त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. एवढंच नाही तर पाकिस्तानसोबतचा व्यापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, आयात -निर्यातीवर देखील बंदी घालण्यात आल्यानं आधीच भारतानं पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या होत्या.

त्यानंतर भारतानं पीओके आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ज्यामध्ये पीओकेमधील पाच तर पाकिस्तानमधील चार दहशतवादी अड्ड्यांचा समावेश होता, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला. पाकिस्तानकडून देखील भारतावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र भारतानं हे हल्ले परतून लावले, त्यानंतर भारतानं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केला होता, पाकिस्तानच्या 15 शहरांवर 50 ड्रोन हल्ले करण्यात आले, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची संपूर्ण रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली होती, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं.

दरम्यान त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेनं यशस्वी मध्यस्थी केली आहे. भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाला संमती दर्शवली आहे, आज पाच वाजेपासून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र युद्धविराम करतानाच दहशतवादी कारवांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही अशी घोषणा भारताच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे. युद्धविराम झाला आहे.  त्यानंतर आता 12 मे रोजी दोन्ही देशाचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत.  भारतानं आपल्या अटींवर युद्धविरामाला संमती दर्शवली.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.