AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याचना नहीं अब रण होगा… भारतीय सैन्याचा थेट इशारा, म्हणाले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमला भेदणं मुश्किल…

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पार्श्वभूमीवर, १२ मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओ दरम्यान चर्चा झाली. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानी वायूसेनेवर केलेल्या कारवाईची माहिती दिली.

याचना नहीं अब रण होगा… भारतीय सैन्याचा थेट इशारा, म्हणाले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमला भेदणं मुश्किल...
dgmo press conference
| Updated on: May 12, 2025 | 3:56 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अद्याप कायम आहे. आज म्हणजेच 12 मे रोजी या दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा होणार आहे. यापूर्वी भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती देण्यात आली. त्यासोबतच आजच्या पत्रकार परिषदेत भारतीय लष्कराने पाकिस्तानी वायूसेनेला कसं पाणी पाजलं, याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी भारताचे डीजीएमओ तथा लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी याचना नही रण होगा… जीवन जय या मरण होगा असे म्हटले.

भारताचे डीजीएमओ तथा लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. “पुढची लढाई वेगळी असेल. मागच्या लढाई सारखी नसेल. कारण टेक्नॉलॉजी खूप प्रगत होत आहे. देव करो पण लढाई होऊ नये. मात्र, कोणत्याही प्रसंगासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही तोंड द्यायला मजबूत आहोत”, असे राजीव घई म्हणाले.

मला बोलायची गरज नाही

“याचना नही रण होगा… जीवन जय या मरण होगा.. अशी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांची कविता राजीव घई यांनी दाखवली. काय संदेश देत आहोत. रामचरित मानसची ओळ आहे. तुम्ही समजून जाल. विनय न माने जलधि-जड़, गए तीन दिन बीत,. बोले राम सकोप तब भय बिनु होय न प्रीत. याचा अर्थ समजदार के लिए इशारा काफी है. कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजी आली तरी तिला सामना करण्यास आम्ही तयार आहोत. मला बोलायची गरज नाही. तुम्ही स्वत पाहिलं आहे”, असेही राजीव घई यांनी सांगितले.

“पुढची लढाई झाली तर वेगळी असेल. मागच्या लढाई सारखी नसेल. कारण टेक्नॉलॉजी खूप प्रगत होत आहे. देव करो पण लढाई होऊ नये. मात्र, कोणत्याही प्रसंगासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही तोंड द्यायला मजबूत आहोत”, असेही राजीव घईंनी म्हटले.

दहशतवाद्यांची कारवायांची पद्धत बदलली

“आमची लढाई ही दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात होती. त्यामुळे आम्ही 7 मे रोजी फक्त दहशतवाद्यांवर हल्ला केला. पण दुर्दैव म्हणजे पाकिस्तानने दहशतवाद्यांना साथ दिली. गेल्या बऱ्याच वर्षांपासून लष्कर तसेच सामान्य नागरिकांवरही हल्ले करण्यात आले. गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांची कारवायांची पद्धत बदलली आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात पहलगाम येथील पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. पहलगामपर्यंत या पापाचा घडा भरला होता,” असं राजीव घई यांनी सांगितलं.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.