AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याचना नहीं अब रण होगा… भारतीय सैन्याचा थेट इशारा, म्हणाले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमला भेदणं मुश्किल…

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पार्श्वभूमीवर, १२ मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओ दरम्यान चर्चा झाली. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानी वायूसेनेवर केलेल्या कारवाईची माहिती दिली.

याचना नहीं अब रण होगा… भारतीय सैन्याचा थेट इशारा, म्हणाले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमला भेदणं मुश्किल...
dgmo press conference
| Updated on: May 12, 2025 | 3:56 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अद्याप कायम आहे. आज म्हणजेच 12 मे रोजी या दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा होणार आहे. यापूर्वी भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती देण्यात आली. त्यासोबतच आजच्या पत्रकार परिषदेत भारतीय लष्कराने पाकिस्तानी वायूसेनेला कसं पाणी पाजलं, याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी भारताचे डीजीएमओ तथा लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी याचना नही रण होगा… जीवन जय या मरण होगा असे म्हटले.

भारताचे डीजीएमओ तथा लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. “पुढची लढाई वेगळी असेल. मागच्या लढाई सारखी नसेल. कारण टेक्नॉलॉजी खूप प्रगत होत आहे. देव करो पण लढाई होऊ नये. मात्र, कोणत्याही प्रसंगासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही तोंड द्यायला मजबूत आहोत”, असे राजीव घई म्हणाले.

मला बोलायची गरज नाही

“याचना नही रण होगा… जीवन जय या मरण होगा.. अशी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांची कविता राजीव घई यांनी दाखवली. काय संदेश देत आहोत. रामचरित मानसची ओळ आहे. तुम्ही समजून जाल. विनय न माने जलधि-जड़, गए तीन दिन बीत,. बोले राम सकोप तब भय बिनु होय न प्रीत. याचा अर्थ समजदार के लिए इशारा काफी है. कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजी आली तरी तिला सामना करण्यास आम्ही तयार आहोत. मला बोलायची गरज नाही. तुम्ही स्वत पाहिलं आहे”, असेही राजीव घई यांनी सांगितले.

“पुढची लढाई झाली तर वेगळी असेल. मागच्या लढाई सारखी नसेल. कारण टेक्नॉलॉजी खूप प्रगत होत आहे. देव करो पण लढाई होऊ नये. मात्र, कोणत्याही प्रसंगासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही तोंड द्यायला मजबूत आहोत”, असेही राजीव घईंनी म्हटले.

दहशतवाद्यांची कारवायांची पद्धत बदलली

“आमची लढाई ही दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात होती. त्यामुळे आम्ही 7 मे रोजी फक्त दहशतवाद्यांवर हल्ला केला. पण दुर्दैव म्हणजे पाकिस्तानने दहशतवाद्यांना साथ दिली. गेल्या बऱ्याच वर्षांपासून लष्कर तसेच सामान्य नागरिकांवरही हल्ले करण्यात आले. गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांची कारवायांची पद्धत बदलली आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात पहलगाम येथील पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. पहलगामपर्यंत या पापाचा घडा भरला होता,” असं राजीव घई यांनी सांगितलं.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.