AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भारत विश्वगुरू बनणार, समाज कायद्याने नव्हे तर संवेदनेने चालतो’, RSS च्या शताब्दी वर्षानिमित्त मोहन भागवत यांचे विधान

RSS Chief Mohan Bhagwat: बंगळुरू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपले विचार मांडले. त्यांनी भारत विश्वगुरू बनणार असल्याचे म्हटले आहे.

'भारत विश्वगुरू बनणार, समाज कायद्याने नव्हे तर संवेदनेने चालतो', RSS च्या शताब्दी वर्षानिमित्त मोहन भागवत यांचे विधान
mohan-bhagwat speech
| Updated on: Nov 08, 2025 | 6:05 PM
Share

बंगळुरू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी संघाचे कौतुक करताना संघाचे वर्णन जगातील सर्वात अद्वितीय संघटना असे केले. संघ भारतासह अनेक देशांमध्ये सामाजिक सेवा कार्यात गुंतलेला आहे असंही भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत विश्व गुरू बनणार

RSS कडून आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले की, जेव्हा भारत जगाला आपलेपणाचे तत्व शिकवेल तेव्हाच भारत विश्व गुरू बनेल. तसेच प्राचीन भारतीय ज्ञान आणि आधुनिक विज्ञानातील यांच्यातील समानतेवर बोलताना भागवत म्हणाले की, आपली परंपरा ज्याला ‘ब्रह्म’ किंवा ‘ईश्वर’ म्हणते, आज विज्ञान त्याला “यूनिवर्सल कॉन्शसनेस” असे म्हणतात. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, ‘समाज केवळ कायद्याने नियंत्रित होत नाही तर सामाजिक सहानुभूतीने चालतो. समाजात सतत आपलेपणाची भावना राखणे आवश्यक आहे. कारण आपलेपणाची ही भावना समाजाला एकत्र आणण्याचे काम करते.’

मोहन भागवत यांनी पुढे बोलताना म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे डॉ. हेडगेवार यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्या शाळेत ब्रिटिश अधिकाऱ्यांचे स्वागत वंदे मातरम म्हणून करण्यात सुरुवात केली होती. त्यावेळीही डॉ. हेडगेवार लोकांना ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ असे म्हणण्यास प्रोत्साहित करत होते. या प्रयत्वातून त्यांचे भारतावरील प्रेम दिसून येते. हेडगेवार हे एक धार्मिक नेते आणि समाजसुधारक होते.

पुढे बोलताना राष्ट्रीय एकतेवर बोलताना भागवत म्हणाले की, “आज आपली जनता राजकीयदृष्ट्या एकजूट राहिलेली नाही. सामान्य लोकांनीही राजकीयदृष्ट्या जागरूक असले पाहिजे. राजकीय जागरूकतेमुळे सामान्य लोकांना ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ असे म्हणण्याचे धाडस मिळाले आहे.

आरएसएस ही समाजाची संघटना

आपल्या भाषणात पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ‘संघ राष्ट्रीय घडामोडींमध्ये भाग घेतो, मात्र तो राजकीय पक्ष नाही. आरएसएस ही समाजाची संघटना आहे, समाजातील संघटना नाही. आपण संघ समजून घेतला पाहिजे. संघाचे अनेक हितचिंतक संघाला एका विशिष्ट परिस्थितीची प्रतिक्रिया म्हणून चित्रित करतात, परंतु तसे नाही. संघ कोणत्याही प्रतिक्रियेतून किंवा निषेधातून जन्माला आला नाही. संघ प्रत्येक समाजाची एक आवश्यक गरज पूर्ण करण्यासाठी अस्तित्वात आला आहे. संघ म्हणजे हिंदू समाज. त्यामुळे हा समाज संघटित असला पाहिजे.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...