ताशी 80 किमी वेग, 17 राज्यांवर संकट, 8 तास अत्यंत धोक्याची, तब्बल..
Today Weather : पुढील 8 तास अत्यंत धोक्याची असणार आहेत. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. तब्बल 17 राज्यांवर संकट आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस होईल. प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे बघायला मिळत आहे. पावसाने थैमान घालण्यास सुरूवात केली.

17 राज्य संकटात आहेत. भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील 8 तासात 17 राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. देशातील काही राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्णता बघायला मिळत होती. आता उष्णतेपासून दिलासा मिळाला असतानाच दुसरीकडे पाऊस धुमाकूळ घालत आहे. आज तब्बल 17 राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये तर निसर्गाचे एक वेगळे रूप बघायला मिळत आहे. चक्रीवादळासह अतिमुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. आज 31 मे 2026 रोजी वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग यादरम्यान ताशी 80 किलोमीटरच्या पुढे असू शकतो. मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाने धुमाकूळ घातला.
भारतीय हवामान विभागाने गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, त्रिपुरा, मिझोराम, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, झारखंड, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, मिझोराम या राज्यांना पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील 8 तास अत्यंत धोक्याची आहेत. काही राज्यांमध्ये तर जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आलाय.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 30 मे रोजी मॉन्सून अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि लक्षद्वीप बेटांच्या अनेक नवीन भागांमध्ये दाखल झाला. पुढील चार ते पाच दिवसांत तामिळनाडू, केरळ आणि इतर भागांमध्ये पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल राहील. देशात मॉन्सून लवकरच दाखल होईल. मात्र, त्यापूर्वीच अवकाळी पाऊस देशात धुमाकूळ घालत आहे.
यंदा देशात जवळपास वर्षभरापासून कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. उत्तर प्रदेशमध्ये अतिमुसळधार पावसासह चक्रीवादळ झाल्याने थेट नदीवरील पुल कोसळला. ज्यावेळी हा पुल कोसळला, त्यावेळी पुलावर काम सुरू होते. अनेक लोक ढिसाऱ्याखाली दबली गेली. चक्रीवादळ सुरू असल्याने तात्काळ मदत पोहोचवणेही प्रशासनासाठी कठीण झाले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला तात्काळ मदतकार्य पोहोचवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
