AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7, 8, 9, 10, 11 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, 13 राज्य संकटात, मोठा धोका, वादळी वाऱ्यासह..

Heavy Rain Warning : राज्यासह देशात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान खात्याने अत्यंत मोठा इशारा दिला. अवकाळी पाऊस बरसणार आहे. जवळपास सर्वच राज्यात भारतीय हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला.

7, 8, 9, 10, 11 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, 13 राज्य संकटात, मोठा धोका, वादळी वाऱ्यासह..
Rain
| Updated on: Jun 06, 2026 | 5:35 PM
Share

राज्यासह देशात हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला असला तरीही अजून राज्यात पोहोचला नाही. मात्र, त्यापूर्वीच अनेक राज्यात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह होतोय. चक्रीवादळासह जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही तास अनेक राज्यांकरिता धोक्याची आहेत.  भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये मोठा इशारा देण्यात आला.मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जम्मू- काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 7 ते 11 जून दरम्यान पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

ईशान्येकडील राज्यात पाऊस काही दिवस असेल. 5 जून ते 11 जून दरम्यान मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड याठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6 आणि 7 जून रोजी आसाम आणि मेघालयमध्ये, 6 ते 8 जून दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि ताशी 50 किलोमीटर वेगाचे सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातही पुढील काही दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनची वाट बघितली जात आहे. फक्त महाराष्ट्रच नाही गोवा, गुजरातमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्याच्या अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. गुजरातमध्येही जोरदार वारे आणि वादळी वाऱ्यासह पाऊस असेल. यंदा देशात पावसाचा मोठा अंदाज आहे. दोन दिवस उशिरा केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला. यानंतर हळूहळू मॉन्सून पुढे सरकेल. शेतकऱ्यांच्या नजरा मॉन्सूनच्या पावसावर आहे. अवकाळी पाऊस देशातून जाण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात