Operation Sindoor ची इनसाईड स्टोरी : पाकिस्तानवर हल्ल्याचा अंतिम फैसला कुणाचा?
Operation Sindoor Inside Story : आज भारतीयांचा दिवस भल्या पहाटेच उगवला. देशभरात ऑपरेशन सिंदूरची भल्या पहाटेपासूनच चर्चा रंगली. मध्यरात्री भारताने PoK मधील दहशतवाद्यांना टार्गेट केले. ऑपरेशन सिंदूरची आता जगभरात चर्चा सुरू आहे. पण या हल्ल्याचा अंतिम फैलला कुणाचा?

भारतीय लष्कराने मिसाईल स्ट्राईक करून पाकिस्तानसह दहशतवाद्यांना थेट संदेश दिला. पहलगाम हल्ल्याच्या 16 दिवसानंतर भारताने या हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तानविरोधात जी कारवाई करण्यात आली, त्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तानातील 9 ठिकाणी मिसाईल अटॅक केला. या हल्ल्यासाठी 7 मे 2025 रोजी रात्री 12:37 वाजता निश्चित करण्यात आला. बहावलपूर, चक आमरू, भिंबेर, मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, सियालकोट, गुलपूर आणि बाग या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले. येथे जैश-ए-मोहम्मदचे लाँच पॅड होते. पण तुम्हाला माहिती आहे का, की पाकिस्तानवरील हल्ल्याचा अंतिम फैसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाही तर दुसऱ्या व्यक्तीने घेतला होता. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोर संपूर्ण योजना मांडली आणि त्यांच्याकडून परवानगी घेण्यात आली. ऑपरेशन सिंदूर केव्हा, कधी आणि कसे राबवले गेले? काय आहे ती इनसाईड स्टोरी ...