AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापरिनिर्वाण दिनादिवशीच बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा अपमान, नेमका विषय काय…

निवेदन देण्यास गेलेल्या नागरिकांना अटक करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीच संविधानाची पायमल्ली करण्यात आल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

महापरिनिर्वाण दिनादिवशीच बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा अपमान, नेमका विषय काय...
| Edited By: | Updated on: Dec 06, 2022 | 11:27 PM
Share

बेळगावः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत असतानाच आज कर्नाटकाने महाराष्ट्रातील दोन मंत्री बेळगावमध्ये जाणार असल्याने जमावबंदीचे आदेश दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या बेळगावमधील मराठी भाषिकांवर आता कर्नाटक सरकारकडून संविधानिक पद्धतीने आवाज उठवणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांवर आता कर्नाटक सरकारची अरेरावी चालू आहे. सीमावाद चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातून मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई आज बेळगावला जाणार होते.

मात्र बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी 144 कलम लागू करून जमावबंदीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर संविधानिक मार्गाने महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आज बेळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते.

त्यावेळी कर्नाटक सरकारने दडपशाही करून संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करत आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चाळीसहून अधिक नेत्यांना अटक करण्यात आली.

बेळगावमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक केल्यानंतर बेळगावसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. कर्नाटक सरकारकडून ही मुस्कटदाबी असल्याची भावना आता सीमाभागातील मराठी भाषिकांकडून व्यक्त केली जात आहे.

निवेदन देण्यास गेलेल्या नागरिकांना अटक करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीच संविधानाची पायमल्ली करण्यात आल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

त्याबद्दल बेळगावमधील कंग्राळी खुर्द गावाने सूचना फलकावर महापरिनिर्वाण दिनादिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच अपमान केल्याचे लिहून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

बेळगावमध्य मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर या घटनेचा आम्ही महाराष्ट्र एकीकरण समिती कंग्राळी खुर्द यांच्यावतीने जाहीर निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधानाचा अपमान करणाऱ्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो असा टोलाही त्यांनी कर्नाटक सरकारला लगावला आहे.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.