AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा भारताला सर्वात मोठा धक्का, आधी जहाजांवर फायरिंग आता तर थेट.., शत्रूही असं वागणार नाही

मोठी बातमी समोर येत आहे, इराणकडून दोनच दिवसांपूर्वी भारताच्या जहाजांवर फायरिंग करण्यात आलं होतं. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे. इराणने भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

इराणचा भारताला सर्वात मोठा धक्का, आधी जहाजांवर फायरिंग आता तर थेट.., शत्रूही असं वागणार नाही
इराणचा भारताला धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 22, 2026 | 6:06 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा युद्धविराम वाढवण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र जरी युद्धविराम वाढला असला तरी देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये अजूनही तणाव कायम आहे. युद्धविराम वाढवण्याची घोषणा करण्यापूर्वी अमेरिकेनं इराणशी संबंधित दोन जहाजं ताब्यात घेतले होते, त्यामुळे इराणने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली, आम्ही याचं उत्तर देऊ अशी धमकी इराणकडून अमेरिकेला देण्यात आली होती. त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे इराणच्या आयआरजीसीने तीन जहाजं स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून ताब्यात घेतली आहेत. हा मार्ग इराने व्यापारी जहाजांसाठी बंद केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. त्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याच दरम्यान इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून जाणारे तीन जहाजं ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.

द वीकच्या एका रिपोर्टनुसार इराणच्या आयआरजीसी ने स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून तीन जहाजं ताब्यात घेतली आहेत, ज्यापैकी एक जहाज भारतामध्ये येणार होतं. Epaminondas नावाचं हे जहाज भारताकडे निघालेलं असतानाच इराणने ताब्यात घेतलं आहे. भारताकडे येणारं हे जहाज एका ग्रीक कंपनीच्या मालकीचं आहे. हे जहाज दुबईच्या जेबेल अली बंदरावरून भारताकडे येण्यासाठी रवाना झालं होतं. मात्र इराणने हे जहाज आपल्या ताब्यात घेतलं आहे. या तीनही जहाजांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप इराणकडून करण्यात आला आहे, हा भारतासाठी आणखी एक धक्का मानला जात आहे.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी इराणकडून भारताचा झेंडा असलेल्या दोन जहाजांवर फायरिंग करण्यात आली होती. दुबईवरून निघालेल्या या जहाजांना पुन्हा एकदा युटर्न घ्यावा लागला होता. हे जहाज कच्चं तेल घेऊन भारताकडे निघाले होते. मात्र स्ट्रेट ऑफ होर्मूज सामुद्रधुनीमध्ये इराणकडून या जहाजांवर फायरिंग करण्यात आली. इराणकडून भारतीय जहाजांवर अचानक फायरिंग झाल्यामुळे वातावरण चांगलचं तापलं होतं. भारत सरकारने या घटनेवर चिंता व्यक्त केली होती. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये परिस्थिती अशीच कायम राहिल्यास जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल