AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | भारतातील ज्यू नागरिक पण टार्गेटवर? केंद्र सरकारने काय दिला इशारा

Israel-Hamas War | मध्य-पूर्वेतीलच नाही तर भारतातील ज्यू नागरिकांवर पण हल्ला होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहेत. पण भारतात ज्यू नागरिक आहेत तरी किती? ते प्रामुख्याने कोणत्या शहरात राहतात? त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने काय अलर्ट दिला आहे?

Israel-Hamas War | भारतातील ज्यू नागरिक पण टार्गेटवर? केंद्र सरकारने काय दिला इशारा
| Updated on: Oct 13, 2023 | 6:45 PM
Share

नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्राईलवर हल्ला चढवला. दोन्ही बाजूने सध्या घमासान युद्ध सुरु आहे. जगभरात ज्यू लोक पसरलेले आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये त्यांची संख्या अधिक आहे. अनेक मुस्लीम राष्ट्रात पण ज्यू नागरिकांचे वास्तव्य आहे. भारतात पण ज्यू रहिवाशी आहेत. देशातील काही संघटना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ नारेबाजी करत असल्याने केंद्र सरकार अलर्टमोडवर आहे. ज्यू नागरिकांच्या जीवितास कुठलाही धोका होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. पण भारतात किती ज्यू नागरिक राहतात माहिती आहे का?

ज्यू नागरिकांच्या वस्तीला संरक्षण

देशातील काही शहरात ज्यू नागरिक राहतात. इस्त्राईलचा दुतावास आहे. त्यांचे अधिकारी, कर्मचारी हे राहत असलेल्या ठिकाणचे संरक्षण वाढविण्यात आले आहे. या भागात पोलीसांसह गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी पण लक्ष ठेऊन आहेत. चीनची राजधानी बिजिंगमध्ये शुक्रवारी इस्त्राईल दुतावासातील अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानंतर भारतातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. संभावित हल्ला टाळण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात आली आहे.

यापूर्वीच्या ठिकाणांना सुरक्षा

मुंबई 26/11 हल्ल्यात ज्यू नागरिकांना पण लक्ष्य करण्यात आले होते. पुण्यातील जर्मन बेकरी येथे बॉम्बस्फोट घडवून आणला होता. कोरेगाव पार्कमधील चबड हाऊस पण त्यांच्या हिटलिस्टवर होते. दिल्लीतील काही ठिकाणी ज्यू नागरिक राहतात, या ठिकाणची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांच्या प्रार्थना स्थळांना पण सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

ज्यूंचे भारताशी जुने संबंध

दोन हजार पूर्वी ज्यू नागरिक भारतात स्थलांतरीत झाले. भारतात दाखल होणार ज्यू हा पहिला परदेशी धर्म आहे. भारतात सध्या 6,000 ज्यू नागरिक आहेत. पॅलेस्टाईनच्या भूमीतून ते भारतात दाखल झाले होते. त्यांचे महाराष्ट्राशी घट्ट नाते आहे. कोकण आणि मुंबई पट्ट्यात बेने इस्त्राईल यांची संख्या सर्वात जास्त होती. त्यातील काही इस्त्राईलमध्ये गेले. कोलकत्ता भागात बगदादी ज्यू तर उत्तर भारतात बेनेई मिनाशे यांची पण संख्या आहे. त्यांची ओळख इस्त्राईलने डीएनएवरुन केली होती.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!