AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | भारतातील ज्यू नागरिक पण टार्गेटवर? केंद्र सरकारने काय दिला इशारा

Israel-Hamas War | मध्य-पूर्वेतीलच नाही तर भारतातील ज्यू नागरिकांवर पण हल्ला होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहेत. पण भारतात ज्यू नागरिक आहेत तरी किती? ते प्रामुख्याने कोणत्या शहरात राहतात? त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने काय अलर्ट दिला आहे?

Israel-Hamas War | भारतातील ज्यू नागरिक पण टार्गेटवर? केंद्र सरकारने काय दिला इशारा
| Updated on: Oct 13, 2023 | 6:45 PM
Share

नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्राईलवर हल्ला चढवला. दोन्ही बाजूने सध्या घमासान युद्ध सुरु आहे. जगभरात ज्यू लोक पसरलेले आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये त्यांची संख्या अधिक आहे. अनेक मुस्लीम राष्ट्रात पण ज्यू नागरिकांचे वास्तव्य आहे. भारतात पण ज्यू रहिवाशी आहेत. देशातील काही संघटना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ नारेबाजी करत असल्याने केंद्र सरकार अलर्टमोडवर आहे. ज्यू नागरिकांच्या जीवितास कुठलाही धोका होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. पण भारतात किती ज्यू नागरिक राहतात माहिती आहे का?

ज्यू नागरिकांच्या वस्तीला संरक्षण

देशातील काही शहरात ज्यू नागरिक राहतात. इस्त्राईलचा दुतावास आहे. त्यांचे अधिकारी, कर्मचारी हे राहत असलेल्या ठिकाणचे संरक्षण वाढविण्यात आले आहे. या भागात पोलीसांसह गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी पण लक्ष ठेऊन आहेत. चीनची राजधानी बिजिंगमध्ये शुक्रवारी इस्त्राईल दुतावासातील अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानंतर भारतातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. संभावित हल्ला टाळण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात आली आहे.

यापूर्वीच्या ठिकाणांना सुरक्षा

मुंबई 26/11 हल्ल्यात ज्यू नागरिकांना पण लक्ष्य करण्यात आले होते. पुण्यातील जर्मन बेकरी येथे बॉम्बस्फोट घडवून आणला होता. कोरेगाव पार्कमधील चबड हाऊस पण त्यांच्या हिटलिस्टवर होते. दिल्लीतील काही ठिकाणी ज्यू नागरिक राहतात, या ठिकाणची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांच्या प्रार्थना स्थळांना पण सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

ज्यूंचे भारताशी जुने संबंध

दोन हजार पूर्वी ज्यू नागरिक भारतात स्थलांतरीत झाले. भारतात दाखल होणार ज्यू हा पहिला परदेशी धर्म आहे. भारतात सध्या 6,000 ज्यू नागरिक आहेत. पॅलेस्टाईनच्या भूमीतून ते भारतात दाखल झाले होते. त्यांचे महाराष्ट्राशी घट्ट नाते आहे. कोकण आणि मुंबई पट्ट्यात बेने इस्त्राईल यांची संख्या सर्वात जास्त होती. त्यातील काही इस्त्राईलमध्ये गेले. कोलकत्ता भागात बगदादी ज्यू तर उत्तर भारतात बेनेई मिनाशे यांची पण संख्या आहे. त्यांची ओळख इस्त्राईलने डीएनएवरुन केली होती.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.