Amarnath Cloudburst : अमरनाथ गुहेजवळ पुन्हा पावसाचे संकट; जम्मूहून यात्रेकरूंची तुकडी निघणार नाही; प्रवासावर पुन्हा बंदी

ढगफुटीनंतर अनेक तंबू आणि सामुदायिक किचन चिखल आणि ढिगाऱ्याच्या कचाट्यात सापडले होते. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

Amarnath Cloudburst : अमरनाथ गुहेजवळ पुन्हा पावसाचे संकट; जम्मूहून यात्रेकरूंची तुकडी निघणार नाही; प्रवासावर पुन्हा बंदी
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 12:46 PM

मुंबईः दरवर्षी मोठ्या उत्साहात होणाऱ्या अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) यंदा पुन्हा ब्रेक लागला, ढगफुटीचे संकट (Claud burst) आल्याने अमरनाथ यात्रेमध्ये 16 भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आजही अमरनाथ गुहेजवळील हवामान पावसाचे असल्याने जम्मू शहरातून भाविकांची तुकडी आज रवाना होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. कारण आज अमरनाथ गुहेजवळ पुन्हा हवामान खराब असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच आजही प्रवासावर तात्पुरती बंदी (Temporary travel ban) घालण्यात आली आहे. पवित्र गुहेजवळ ढगफुटीच्या घटनेत 16 जणांचा मृत्यू झाल्याने यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. यावर्षी अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार असून 30 जूनपासून दोन मार्गांनी ही यात्रा सुरू करण्यात आली आहे.

बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू

यापैकी एक मार्ग 48 किमी लांबीचा आहे, जो दक्षिण काश्मीरच्या पहलगाममधील नूनवानमधून जातो. त्याचवेळी, दुसरा मार्ग तुलनेने लहान आणि 14 किमीचा आहे, जो एक तीव्र चढण आहे आणि मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बालटालमधून जातो. तत्पूर्वी, जम्मू शहरातून शनिवारी सुमारे 6,000 यात्रेकरूंची 11 वी तुकडी काश्मीरमधील दोन बेस कॅम्पसाठी रवाना झाली, मात्र, शुक्रवारी सायंकाळी पवित्र गुहेजवळ ढगफुटी झाली. त्यामुळे यात्रा पुढे ढकलण्यात आली.

अनेक तंबू गेले वाहून

ढगफुटीनंतर अनेक तंबू आणि सामुदायिक किचन चिखल आणि ढिगाऱ्याच्या कचाट्यात सापडले होते. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

अमरनाथ यात्रा 11 ऑगस्टला संपणार

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कडक बंदोबस्तात जम्मू शहरातील भगवतीनगर यात्री निवास येथून 279 वाहनांमधील 6,048 यात्रेकरूंची तुकडी रवाना झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, पहाटे 3.30 वाजता, 115 वाहनांमधून 1,404 यात्रेकरू बालटाल मार्गे भगवतीनगर कॅम्पसाठी रवाना झाले, तर 4,014 यात्रेकरू 164 वाहनांमधून पहलगामकडे रवाना झाले.

 1 लाख भाविकांनी घेतले  दर्शन

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत सुमारे एक लाख भाविकांनी पवित्र गुहेतील शिवलिंगाचे दर्शन घेतले होते, रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 11 ऑगस्ट रोजी यात्रेची सांगता होणार आहे, मात्र खराव हवामानामुळे आता भाविकांना दर्शन मिळणार की नाही याबद्दल सांशकता आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.