AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार चर्चेसाठी तयार, पण राहुल गांधींना आंदोलन चिघळवायचंय, जितेंद्र सिंह यांचा गंभीर आरोप!

राहुल गांधींनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना सरकारसोबत चर्चाच करायची नाही. त्यांना आंदोलन चिघळवायचं आहे, असाही आरोप जितेंद्र सिंह यांनी केला.

सरकार चर्चेसाठी तयार, पण राहुल गांधींना आंदोलन चिघळवायचंय, जितेंद्र सिंह यांचा गंभीर आरोप!
jitendra singh and rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 7:08 PM
Share

Rahul Gandhi Delhi Protest : राजधानी दिल्लीत सध्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या विरोधी बाकावरील राजकीय पक्षांचे खासदार, आमदार तसेच नेतेमंडळींनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापुढे हे आंदोलन करण्यात आले. त्यांनी केंद्र सरकारपुढे एकूण पाच मागण्या ठेवल्या आहेत. राहुल गांधी यांची समजूत काढण्यासाठी सरकारतर्फे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना पाठवण्यात आले होते. आता राहुल गांधी यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, त्यांची भूमिका काय आहे? याबाबत जितेंद्र सिंह यांनी सविस्तर सांगितले आहे.

राहुल गांधींनी यूटर्न घेतला

राहुल गांधी यांच्या भेटीनंतर सरकार विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि लाठीचार्ज यावर संसदेत चर्चा करायला तयार आहे. आम्हाला कोणतीच अडचण नाही. आम्ही राहुल गांधींसमोर ही गोष्ट ठेवली, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. तसेच केंद्राने काँग्रेसला संसदेत चर्चा करायला परवानगी दिली तर आम्ही आंदोलनातून मागे हटू असं राहुल गांधी म्हणाले होते. आम्ही त्यांना होकार कळवला. पण त्यांनी यूटर्न घेतला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. ते म्हणाले, आता आमची इच्छा. आम्ही हटणार नाही, अशी राहुल गांधी यांची भूमिका असल्याचा दावा जितेंद्र सिंह यांनी केला.

त्यांना सरकारसोबत चर्चाच करायची नाही

राहुल गांधी यांच्या या भूमिकेनंतर हे योग्य नाही. तुम्ही शब्द फिरवत आहात, असं आम्ही त्यांना म्हणालो. त्यानंतर ते म्हणाले, तुम्हाला जो निष्कर्ष काढायचा तो काढा. मी कोणत्या मागण्या करायच्या ही माझी मर्जी आहे. राहुल गांधींनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना सरकारसोबत चर्चाच करायची नाही. त्यांना आंदोलन चिघळवायचं आहे, असाही आरोप जितेंद्र सिंह यांनी केला. पंतप्रधानांनी या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. देशातील नागरिकांना कोणताही त्रास होऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तरीही राहुल गांधी ऐकत नसेल तर योग्य नाही, असंही त्यांनी बोलून दाखवलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...