AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार चर्चेसाठी तयार, पण राहुल गांधींना आंदोलन चिघळवायचंय, जितेंद्र सिंह यांचा गंभीर आरोप!

राहुल गांधींनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना सरकारसोबत चर्चाच करायची नाही. त्यांना आंदोलन चिघळवायचं आहे, असाही आरोप जितेंद्र सिंह यांनी केला.

सरकार चर्चेसाठी तयार, पण राहुल गांधींना आंदोलन चिघळवायचंय, जितेंद्र सिंह यांचा गंभीर आरोप!
jitendra singh and rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 7:08 PM
Share

Rahul Gandhi Delhi Protest : राजधानी दिल्लीत सध्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या विरोधी बाकावरील राजकीय पक्षांचे खासदार, आमदार तसेच नेतेमंडळींनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापुढे हे आंदोलन करण्यात आले. त्यांनी केंद्र सरकारपुढे एकूण पाच मागण्या ठेवल्या आहेत. राहुल गांधी यांची समजूत काढण्यासाठी सरकारतर्फे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना पाठवण्यात आले होते. आता राहुल गांधी यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, त्यांची भूमिका काय आहे? याबाबत जितेंद्र सिंह यांनी सविस्तर सांगितले आहे.

राहुल गांधींनी यूटर्न घेतला

राहुल गांधी यांच्या भेटीनंतर सरकार विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि लाठीचार्ज यावर संसदेत चर्चा करायला तयार आहे. आम्हाला कोणतीच अडचण नाही. आम्ही राहुल गांधींसमोर ही गोष्ट ठेवली, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. तसेच केंद्राने काँग्रेसला संसदेत चर्चा करायला परवानगी दिली तर आम्ही आंदोलनातून मागे हटू असं राहुल गांधी म्हणाले होते. आम्ही त्यांना होकार कळवला. पण त्यांनी यूटर्न घेतला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. ते म्हणाले, आता आमची इच्छा. आम्ही हटणार नाही, अशी राहुल गांधी यांची भूमिका असल्याचा दावा जितेंद्र सिंह यांनी केला.

त्यांना सरकारसोबत चर्चाच करायची नाही

राहुल गांधी यांच्या या भूमिकेनंतर हे योग्य नाही. तुम्ही शब्द फिरवत आहात, असं आम्ही त्यांना म्हणालो. त्यानंतर ते म्हणाले, तुम्हाला जो निष्कर्ष काढायचा तो काढा. मी कोणत्या मागण्या करायच्या ही माझी मर्जी आहे. राहुल गांधींनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना सरकारसोबत चर्चाच करायची नाही. त्यांना आंदोलन चिघळवायचं आहे, असाही आरोप जितेंद्र सिंह यांनी केला. पंतप्रधानांनी या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. देशातील नागरिकांना कोणताही त्रास होऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तरीही राहुल गांधी ऐकत नसेल तर योग्य नाही, असंही त्यांनी बोलून दाखवलं.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?.

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?

Bachchu Kadu : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बच्चू कडू मुद्याचं, समोरच्याला विचार करायला भाग पाडणारं बोलले.

Bachchu Kadu : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बच्चू कडू मुद्याचं, समोरच्याला विचार करायला भाग पाडणारं बोलले

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे.

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन

‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर….

‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर…