AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार चर्चेसाठी तयार, पण राहुल गांधींना आंदोलन चिघळवायचंय, जितेंद्र सिंह यांचा गंभीर आरोप!

राहुल गांधींनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना सरकारसोबत चर्चाच करायची नाही. त्यांना आंदोलन चिघळवायचं आहे, असाही आरोप जितेंद्र सिंह यांनी केला.

सरकार चर्चेसाठी तयार, पण राहुल गांधींना आंदोलन चिघळवायचंय, जितेंद्र सिंह यांचा गंभीर आरोप!
jitendra singh and rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 7:08 PM
Share

Rahul Gandhi Delhi Protest : राजधानी दिल्लीत सध्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या विरोधी बाकावरील राजकीय पक्षांचे खासदार, आमदार तसेच नेतेमंडळींनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापुढे हे आंदोलन करण्यात आले. त्यांनी केंद्र सरकारपुढे एकूण पाच मागण्या ठेवल्या आहेत. राहुल गांधी यांची समजूत काढण्यासाठी सरकारतर्फे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना पाठवण्यात आले होते. आता राहुल गांधी यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, त्यांची भूमिका काय आहे? याबाबत जितेंद्र सिंह यांनी सविस्तर सांगितले आहे.

राहुल गांधींनी यूटर्न घेतला

राहुल गांधी यांच्या भेटीनंतर सरकार विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि लाठीचार्ज यावर संसदेत चर्चा करायला तयार आहे. आम्हाला कोणतीच अडचण नाही. आम्ही राहुल गांधींसमोर ही गोष्ट ठेवली, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. तसेच केंद्राने काँग्रेसला संसदेत चर्चा करायला परवानगी दिली तर आम्ही आंदोलनातून मागे हटू असं राहुल गांधी म्हणाले होते. आम्ही त्यांना होकार कळवला. पण त्यांनी यूटर्न घेतला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. ते म्हणाले, आता आमची इच्छा. आम्ही हटणार नाही, अशी राहुल गांधी यांची भूमिका असल्याचा दावा जितेंद्र सिंह यांनी केला.

त्यांना सरकारसोबत चर्चाच करायची नाही

राहुल गांधी यांच्या या भूमिकेनंतर हे योग्य नाही. तुम्ही शब्द फिरवत आहात, असं आम्ही त्यांना म्हणालो. त्यानंतर ते म्हणाले, तुम्हाला जो निष्कर्ष काढायचा तो काढा. मी कोणत्या मागण्या करायच्या ही माझी मर्जी आहे. राहुल गांधींनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना सरकारसोबत चर्चाच करायची नाही. त्यांना आंदोलन चिघळवायचं आहे, असाही आरोप जितेंद्र सिंह यांनी केला. पंतप्रधानांनी या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. देशातील नागरिकांना कोणताही त्रास होऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तरीही राहुल गांधी ऐकत नसेल तर योग्य नाही, असंही त्यांनी बोलून दाखवलं.

Follow Us
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?