AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानवापीचा ऐतिहासिक निर्णय देणारे न्यायधीश निवृत्त, शेवटच्या दिवशी ऐतिहासिक आदेश

Varanasi court order | वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर काशीमधील ज्ञानवापीचे तळघर तब्बल 31 वर्षानंतर मध्यरात्री उघडले. नोव्हेंबर 1993 नंतर या ठिकाणी पूजा झाली. वाराणसी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांनी हा निर्णय दिला होता. त्यानंतर ते निवृत्त झाले.

ज्ञानवापीचा ऐतिहासिक निर्णय देणारे न्यायधीश निवृत्त, शेवटच्या दिवशी ऐतिहासिक आदेश
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 01, 2024 | 2:12 PM
Share

नवी दिल्ली, दि.1 फेब्रुवारी 2024 | काशीमधील ज्ञानवापीचे तळघर तब्बल 31 वर्षानंतर मध्यरात्री न्यायालयाच्या आदेशानंतर उघडले. तळघरात पूजा करण्यात आली. आरतीसुद्धा झाली. वाराणसी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांनी हा निर्णय दिला होता. त्यानीच भारतीय पुरातत्व विभागाला सर्वे करण्याचे आदेश दिले होते. सर्वेनंतर त्या ठिकाणी हिंदू मंदिराचे पुरावे मिळाले. यामुळे न्या. विश्वेस यांनी पूजा सुरु करण्याचे आदेश दिले. आदेश काढल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 जानेवारी रोजी ते सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांच्या या निकालामुळे त्याचे नाव ऐतिहासिक निकाल देणाऱ्या न्यायाधिशांमध्ये पोहचले आहे. आता इतिहासात त्यांच्या या निर्णयाचे उदाहरण कायमस्वरुपी राहणार आहे.

9 तासांत बॅरीकेड काढले

वाराणसी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी डॉ. अजय कृष्ण विश्वेश विविध पदांवर काम केले. ज्ञानवापी खटल्याची सुनावणी त्यांच्यापुढे सुरु होताच ते चर्चेत आले. जिल्हा न्यायाधीश म्हणून वाराणसी न्यायालयात ते 21 ऑगस्ट 2021 रोजी आले होते. त्यांनी ज्ञानवापी प्रकरणाचा निकाल दिल्यावर 9 तासांत बॅरीकेड काढण्यात आले. रात्री पूजाही करण्यात आली.

पुजारी काय म्हणाले…

पुजारी माधव दत्त त्रिपाठी यांनी म्हटले की, आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. न्यायालयाचा हा निर्णय सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. आधी आम्हाला जाऊ देत नव्हते. आता मी या ठिकाणी पूजाअर्चा करणार आहे. धूप-दीप प्रज्वलित होईल. आरती होईल. मूर्तीचे सृजन होईल. जी बाबा विश्वनाथ यांच्या पूजेची प्रक्रिया तिच प्रक्रिया व्यास तळघरात होणार आहे.

मध्यरात्रीच झाली पूजा

न्यायालयाच्या आदेशानंतर काशीमधील ज्ञानवापीचे तळघर तब्बल 31 वर्षानंतर मध्यरात्री उघडले. रात्री पूजन आणि आरती करण्यात आली. यापूर्वी नोव्हेंबर 1993 पर्यंत या ठिकाणी पूजा केली जात होती. परंतु तत्कालीन मुलायमसिंह यादव सरकारनेराज्य सरकारने ही पूजा थांबली. आता ती पुन्हा सुरु झाल्यामुळे हिंदू पक्षाकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा

मध्यरात्री ज्ञानवापीचे तळघर उघडले, 31 वर्षानंतर पूजा, गणेश-लक्ष्मीची आरती

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण