AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता थेट राष्ट्रीय पक्षाला खिंडार? थेट 25 खासदार फुटणार, देशभरात खळबळ; ममतादीदी, उद्धव ठाकरेनंतर कुणाचा नंबर?

Politics : काही दिवसांपूर्वी टीएमसीच्या 20 खासदारांनी NCPI या पक्षात सामील होत NDA ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता देशातील एका बड्या पक्षाचे 25 खासदार फुटण्याची शक्यता आहे.

आता थेट राष्ट्रीय पक्षाला खिंडार? थेट 25 खासदार फुटणार, देशभरात खळबळ; ममतादीदी, उद्धव ठाकरेनंतर कुणाचा नंबर?
SP 25 MP May Leave PartyImage Credit source: Google
| Updated on: Jun 17, 2026 | 6:46 PM
Share

देशाच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी टीएमसीच्या 20 खासदारांनी NCPI या पक्षात सामील होत NDA ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून 6 खासदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच आता आणखी एका राष्ट्रीय पक्षाला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. या पक्षाचे 25-26 खासदार फुटण्याची शक्यता भाजपच्या एक बड्या नेत्याने वर्तवली आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेत झालेल्या फुटीचे उदाहरण देत भाजप नेत्यांकडून उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षातही मोठी फूट पडणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी कानपूर येथे माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. समाजवादी पक्षाचे (सपा) 25 ते 26 खासदार सध्या पक्ष सोडण्यासाठी आणि पक्षात फूट पाडण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत असं मौर्य यांनी म्हटलं आहे. भाजप सध्या समाजवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र, 2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांपर्यंत हे नेते आपोआप पक्ष सोडून जातील, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे आता उत्तर प्रदेशच्या राजकारणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्री राजभर यांनीही दिले संकेत…

याआधी उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. राजभर यांनी पोस्टमध्ये लिहिले की, समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार असून रामगोपाल यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र दिले आहे. खनन घोटाळा आणि गोमती रिव्हर फ्रंट घोटाळ्याचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, या घोटाळ्यांचा सूत्रधार कोण आहे हे संपूर्ण उत्तर प्रदेशला माहिती आहे. तपासाची कडक कारवाई सुरू झाल्याने समाजवादी पक्ष अस्वस्थ झाला असून पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये जाण्यास तयार आहेत, असा दावा त्यांनी केला.

समाजवादी पार्टीने काय म्हटले?

पक्ष फुटण्याच्या दाव्यावर समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि सपाचे आमदार माता प्रसाद पांडे यांनी म्हटले की, ‘ओम प्रकाश राजभर हे स्वतःच एक घोटाळा आहेत.’ पांडे यांनी राज्यात हुकूमशाहीचे वातावरण असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री आणि सरकारच्या भाषाशैलीवरही टीका केली. तर सपाचे नेते रविदास मेहरोत्रा यांनी राजभर यांना दुतोंडी असं म्हटलं आहे. ते केवळ मंत्रिपद टिकवून ठेवण्यासाठी अशी विधाने करतात. समाजवादी पक्षाचा एकही नेता भाजपमध्ये जाणार नाही आणि 2027 मध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सपाचे सरकार स्थापन होईल असंही मेहरोत्रा यांनी म्हटले आहे.

Follow Us
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!
डोळ्यात पाणी अन्... tv9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भावूक
डोळ्यात पाणी अन्... tv9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भावूक
चार्टर्ड विमानातून दिल्ली दौरा, चाललंय तरी काय? अंजली दमानिया मैदानात
Anjali Damania | चार्टर्ड विमानातून दिल्ली दौरा, चाललंय तरी काय? आता अंजली दमानिया मैदानात, मागितला हिशोब!