AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Plane Crash : लग्नाच्या 5 महिन्यांनी भेटणार होती पतीला, पण…विमान अपघातात खुशबूची स्वप्नं ध्वस्त!

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मनाला हेलावून टाकणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Ahmedabad Plane Crash : लग्नाच्या 5 महिन्यांनी भेटणार होती पतीला, पण...विमान अपघातात खुशबूची स्वप्नं ध्वस्त!
khushboo rajpurohit
| Updated on: Jun 12, 2025 | 9:05 PM
Share

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान एआय-171 चा अपघात झाला आहे. या विमानात एकूण 242 प्रवासी अहमदाबादहून लंडनला जात होते. मात्र या अपघातात फक्त एक प्रवासी वगळता इतर सर्वांचाच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आता याच विमानात प्रवास करणाऱ्या खुशबू नावाच्या नवविवाहित महिलेची काळीज पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे. लग्नानंतर पाच महिन्यांनी ती तिच्या पतीला भेटायला जात होती. मात्र मध्येच विमान अपघाताच्या रुपात तिच्यावर काळाने घाला घातला.

लंडनला असलेल्या पतीकडे जात होती

मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबादमधील विमान अपघातात खुशबू राजपुरोहित या नवविवाहित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही तरुणी मूळची राजस्थानमधील बालोतरा जिल्ग्यातील अराबा दुदावता या गावातील रहिवासी होती. लंडनला जाऊन ही तरुणी आपल्या नव्या जीवनाची सुरुवात करणार होती. मात्र त्याआधीच तिचा या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच ती तिच्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या पतीकडे चालली होती. खूशबू राजपुरोहितचा 18 जानेवारी रोजी विपूल सिंह याच्याशी विवाह झाला होता. तिच्या वडिलांचे नाव मदनसिंह राजपुरोहित असे आहे. तिचा पती म्हणजेच विपूलसिंह हा लंडनमध्ये डॉक्टर म्हणून काम करतो. व्हिसा तसेच अन्य पूर्तता झाल्यानंतर आता ती एअर इंडियाच्या विमानाने लंडनला आपल्या पतीकडे जात होती. मात्र मध्येच विमानाचा अपघात झाला आणि तिची स्वपंही या अपघातात उद्ध्वस्त झाली.

ठरल्यानुसार विमानात बसली पण….

खुशबू सध्या तिच्या सासरी म्हणजेच लुणी येथे राहात होती. ती बुधवारी आपल्या गावाहून अहमदाबादला निघाली होती. गुरुवारच्या एअर इंडियाच्या फ्लाईटने ती लंडनला जाणार होती. ठरल्यानुसार ती एअर इंडियाच्या एआय-171 या विमानात बसलीही होती. मात्र हे विमान टेक ऑफ घेतल्यानंतर लगेच मेघाणी नगर येथे कोसळले. यातच तिचा मृत्यू झाला.

मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न

दरम्यान, एअर इंडियाच्या या अपघातग्रस्त विमानात एकूण 10 क्रू मेंबर्स होते. आता मृतांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांकडे सोपवले जाणार आहेत.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.