AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिमंडळातून राजीनामे देणाऱ्या भाजप नेत्याचं काय? कुणाला काय जबाबदारी मिळणार?

रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या भाजप नेत्याचं पुढे काय होणार? त्यांना कोणती जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे.

मंत्रिमंडळातून राजीनामे देणाऱ्या भाजप नेत्याचं काय? कुणाला काय जबाबदारी मिळणार?
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 10, 2021 | 6:33 AM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला. यात अनेक मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली, तर दुसरीकडे काही मंत्र्यांना आपला राजीनामाही द्यायला लागला. राजीनामा द्यावा लागलेल्यांमध्ये रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या या भाजप नेत्याचं पुढे काय होणार? त्यांना कोणती जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. भाजपमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे भाजपचं नेतृत्व यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे (Know what happened with BJP leaders who resign as Minister from Modi Cabinet).

मंत्रिमंडळातील मोठ्या फेरबदलानंतर आता भारतीय जनता पक्षात (BJP) संघटनात्मक पातळीवर मोठे फेरफार होताना दिसत आहेत. पक्षाचे 3 पदाधिकारी आणि एक प्रवक्त्याचा मंत्रिमंडळात समावेश झालाय. त्यानंत लवकरच या जागांवर नेमणूक होऊ शकते. भाजपचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव, राष्ट्रीय उपाध्यक्ष अन्नपूर्णा देवी, राष्ट्रीय सचिव विशेश्वर टुडु आणि राष्ट्रीय प्रवक्ते राजीव चंद्रशेखर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झालाय. त्यानंतर त्यांच्या पदावरील रिक्त जागा भरण्याचे प्रयत्न सुरू झालेत.

आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देताना 7 जुलैला संबंधित नेत्यांनी आपल्या सेवेची गरज पक्षाला आहे आणि पक्षासाठी आपला अनुभव वापरणार असल्याचं मत व्यक्त केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा देणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर आणि डॉ हर्षवर्धन या सारख्या नेत्यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाईल.

काही नेत्यांना राज्यपाल पदाचीही जबाबदारी

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काही वरिष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा उपयोग पुढील 3-4 महिन्यात होणाऱ्या राज्यपाल नियुक्तीतही केला जाणार आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये जवळपास 6 राज्यपाल निवृत्त होत आहेत. या ठिकाणी नव्या राज्यपालांची नियुक्ती होईल. यात या वरिष्ठ नेत्यांचा समावेश असेल.

भाजपच्या संसदीय बोर्डात 5 पदं रिक्त

भाजपच्या संसदीय बोर्डात मागील मोठ्या काळापासून 4 पदं रिक्त होते. सुषमा स्वराज, अनंत कुमार ,अरुण जेटली यांच्या निधनामुळे 3 पदं रिक्त होती. याशिवाय व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्यानं त्यांची एक जागा आणि आता थावरचंद गेहलोत यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानं त्यांची एक जागा अशा एकूण 5 जागा रिक्त आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपच्या संसदीय बोर्डाच्या या 5 जागा देखील भरल्या जातील.

हेही वाचा :

‘कामगिरीच्या आधारावर खरं तर पंतप्रधानांनी पायउतार व्हावं’, मंत्रिमंडळ विस्तारावरुन काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना टोला

मोदींकडे पाहून जनतेने भाजप खासदारांना निवडलं, त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा त्यांचा निर्णय : अजित पवार

VIDEO: कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत?, उगाच बदनामी करू नका; देवेंद्र फडणवीस भडकले

व्हिडीओ पाहा :

Know what happened with BJP leaders who resign as Minister from Modi Cabinet

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली