AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुद्धिस्ट सर्किटसाठी केंद्राचं एक पाऊल पुढे, कोलंबोवरून कुशीनगरला पहिलं आंतरराष्ट्रीय विमान लँडिंग होणार; मोदी करणार उद्घाटन

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या महानिर्वाणस्थळी म्हणजे कुशीनगर येथे कोलंबोहून पहिलं आंतरराष्ट्रीय विमान लँडिंग होणार आहे. (Kushinagar International Airport inaugural flight land airport)

बुद्धिस्ट सर्किटसाठी केंद्राचं एक पाऊल पुढे, कोलंबोवरून कुशीनगरला पहिलं आंतरराष्ट्रीय विमान लँडिंग होणार; मोदी करणार उद्घाटन
Kushinagar International Airport
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 12:03 PM
Share

नवी दिल्ली: जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या महानिर्वाणस्थळी म्हणजे कुशीनगर येथे कोलंबोहून पहिलं आंतरराष्ट्रीय विमान लँडिंग होणार आहे. 125 मान्यवर आणि बौद्ध भिक्षूंसह हे विमान 20 ऑक्टोबर रोजी कोलंबोवरून कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. बौद्ध स्थळांना जोडण्यासाठी हे विमानतळ अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.

या उद्घाटन समारंभाला उत्तर प्रदेशच्या राज्यापाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्या शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या आठवड्यापासूनच हे विमानतळ सुरू होणार आहे. या विमानतळामुळे अनेकांना भारतातील महत्त्वाच्या बौद्धस्थळांना भेटी देता येणार आहे. तसेच श्रीलंकेसह अनेक देशातील बुद्धानुयायांना भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेल्या कुशीनगरात येणं सोपं जाणार आहे.

300 प्रवाशांची क्षमता

एअर पोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाने राज्य सरकारच्या सहकार्याने 260 कोटी रुपये खर्च करून हे एअरपोर्ट बांधलं आहे. 3600 वर्गमीटरवर हे टर्मिनल भवन बांधण्यात आलं आहे. तसेच एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाने कुशीनगर एअरपोर्टचा विकासही केला आहे. एअर पोर्ट अॅथोरिटीनुसार नवीन टर्मिनल व्यस्ततेच्या काळातही 300 प्रवाशांना सांभाळू शकणार आहे. कुशीनगर हे एक आंतरराष्ट्रीय बौद्धस्थळ आहे. या ठिकाणीच भगवान गौतम बुद्धाचं महानिर्वाण झालं होतं. बुद्धिस्ट सर्किटचा हा एक केंद्रबिंदू आहे. लुंबिनी, सारनाथ आणि गया आदी तिर्थक्षेत्रांचाही या बुद्धिस्ट सर्किटमध्ये समावेश आहे.

बौद्ध थीमवरील सर्किटचा विकास करणार

डायरेक्ट एअर कनेक्टिव्हीटमुळे देश आणि विदेशातील बौद्ध धर्मीयांना कुशीनगरला जाण्यास मदत होणार आहे. या विमानतळामुळे लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्ती, राजगीर, संकिसा आणि वैशालीचा विकास होण्यास मदत होणार आहे. कुशीनगर एअरपोर्टमुळे दक्षिण आशियासोबत डायरेक्ट एअर कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच बुद्धिस्ट थीमवर आधारीत सर्किटमुळे विकासही होणार आहे. श्रीलंका, जपान, तैवान, दक्षिण कोरिया, चीन, थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूर आदी ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना कुशीनगरसह इतर बौद्धस्थळांवर येणं या एअरपोर्टमुळे अधिक सोयीस्कर होणार आहे.

सांस्कृतिक देवाणघेवाण वाढणार

कुशीनगर एअरपोर्ट सुरू झाल्याने बौद्ध सर्किटमुळे सांस्कृतिक देवाणघेवाणही सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचीही वर्दळ वाढेल. तसेच रोजगाराचे मार्गही खुले होतील. या विमानतळाच्या उद्घाटनानंतर कुशीनगर हे बौद्धस्थळ म्हणून नावारुपाला येणार आहे. जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी हे एक महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे. कुशीनगर विमानतळामुळे बिहारमधील बौद्ध स्थळांचाही विकास होण्यास मदत होणार आहे.

बौद्ध सर्किटमध्ये चार बौद्धस्थळांचं अन्यन साधारण महत्त्व आहे. बिहारचा वैशाली जिल्हा बौद्धांचं एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. भगवान बुद्धांनी त्यांचं शेवटचं प्रवचन या ठिकाणी दिलं होतं. तसेच दुसरी धम्मसंगितीही वैशालीलाच झाली होती. त्यानंतर राजगीरचं नाव येतं. राजगीर हे नालंदापासून अवघ्या 19 किलोमीटरवर आहे. नालंदा हे बौद्धांचं शिक्षणाचं केंद्र होतं. या सर्वांना मिळून बौद्ध सर्किटची संकल्पना आली आहे. त्याला अंतिम रुप देण्याचं काम मोदींनी केलं आहे. या बौद्ध सर्किटच्यामुळे या भागातील अर्थव्यवस्थेतही मोठा फरक पडणार आहे.

संबंधित बातम्या:

Video: भाजपच्या मंत्र्यांनी महिला उमेदवाराच्या केसांत हात घातला, काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर, पण खरं काहीतरी वेगळंच!

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजारांवर, सक्रिय रुग्णसंख्याही 227 दिवसातील नीचांकी

Kerala Flood: डोळ्यासमोर अख्खं घर वाहून गेलं, देवभूमी केरळात वरुणराजाचा रुद्रावतार, भूस्खलनात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू

(Kushinagar International Airport inaugural flight land airport from Colombo carrying 125 dignitaries Buddhist Monks)

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश