AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणी यांचा अयोध्या दौरा रद्द, कारण…

ram mandir pran pratishtha | 'मंदिर वही बनायेंगे'चा नारा देऊन लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर आंदोलन सुरु केले. लालकृष्ण अडवाणी यांनी हे आंदोलन सर्वसामान्यांपर्यंत नेले होते. परंतु राम मंदिर सोहळ्याला आज ते जाणार नाहीत.

राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणी यांचा अयोध्या दौरा रद्द, कारण...
lalkrishna advani
| Updated on: Jan 22, 2024 | 11:53 AM
Share

अयोध्या, दि.22 जानेवारी 2024 | भारतीय जनता पक्षाचे बडे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 1990 च्या दशकात राम मंदिर आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1990 साली भाजपने गुजरातमधील सोमनाथ येथून राम रथयात्रा काढली होती. ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा देऊन लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर आंदोलन सुरु केले. लालकृष्ण अडवाणी यांनी हे आंदोलन सर्वसामान्यांपर्यंत नेले होते. यामुळेच विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार आणि इतर अधिकारी स्वतः लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. परंतु लालकृष्ण अडवाणी आणि भाजपचे दुसरे बडे नेते मुरली मनोहर जोशी प्राणप्रतिष्ठा समारंभात येणार नाही.

का येणार अडवाणी, जोशी

लालकृष्ण अडवाणी हे 96 वर्षांचे आहे. मुरली मनोहर जोशी यांचे वय 90 वर्ष आहे. अयोध्येतील वातावरण थंड आहे. यामुळे प्रकृतीच्या कारणावरुन दोन्ही नेत्यांनी अयोध्येत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अडवाणी यांनी म्हटले की, भव्य सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी मिळाली ही भाग्याची गोष्ट आहे. श्री रामाचे मंदिर हे केवळ पूजेचे मंदिर नाही. या देशाचे पावित्र्य आणि या देशाच्या प्रतिष्ठेच्या स्थापनेचे हे निमित्त आहे, असे अडवाणी यांनी म्हटले.

ही भाग्याची गोष्ट..

अडवणी यांनी म्हटले की, दीर्घ प्रतिक्षेनंतर आम्ही भारताच्या ‘स्व’ चे प्रतीक पुन्हा तयार केले. ते आपल्या सर्वांच्या प्रयत्नांच्या जोरावर पूर्ण झाले आहे. आपण आपली दिशा शोधण्याचा प्रयत्न अनेक दशकांपासून करत आहोत, आपल्याला ती सापडली आहे आणि ती प्रस्थापित झाली आहे. आता प्रत्येक भारतीच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण देशातील वातावरण मंगलमय झाले आहे. या वेळी आपणास प्रत्यक्ष तिथे हजर राहण्याची संधी मिळणे म्हणजे कुठल्यातरी जन्मात कुठेतरी केलेले चांगले कृत्य केल्याचे फळ आहे.

अयोध्येत कसे आहे वातावरण

अयोध्येत सकाळी 6 वाजता तापमान 8°C होते. तापमान आणि दृश्यता कमी आहे. हवामान विभागाने आज थंडी असणार असल्याचे म्हटले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कमीत कमी तापमान 7 आणि जास्तीत जास्त तापमान 16 डिग्री सेल्सियस असणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.