AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown : 500 किमीची पायपीट, चालून चालून थकलेल्या 23 वर्षीय तरुणाचा निवारागृहात मृत्यू

कामाच्या शोधात आपलं गाव सोडून शहरात आलेले मजूर लॉकडाऊनमध्ये पुन्हा आपल्या गावाला परतत आहेत.

Lockdown : 500 किमीची पायपीट, चालून चालून थकलेल्या 23 वर्षीय तरुणाचा निवारागृहात मृत्यू
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 03, 2020 | 6:06 PM
Share

हैदराबाद : कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग रोखण्यासाठी (Lockdown Effect Labor Died) देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र, याचा सर्वाधिक फटका हा रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना बसला आहे. कामाच्या शोधात आपलं गाव सोडून शहरात आलेले मजूर लॉकडाऊनमध्ये पुन्हा आपल्या गावाला परतत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतुकीची कुठलीही सुविधा नसल्याने हे मजूर सामानाचं ओझं आपल्या पाठीवर लादून पायीच आपल्या गावाकडे निघाले आहेत. रोजगार, कामधंदा (Lockdown Effect Labor Died) सुटल्यामुळे अनेक मजूर हताश झाले आहेत. अशाच एका 23 वर्षीय मजुराचा बुधवारी रात्री मृत्यू झाला.

जवळपास तीन दिवसांपूर्वी लोगेश बालासुब्रमनी (Logesh Balasubramani) नावाचा मजूर 26 लोकांसह नागपूरहून त्याच्या गावी नामक्कलकडे निघाला. 500 किमीचं अंतर पार केल्यानंतर तो बुधवारी सिकंदराबादच्या शेल्टर होममध्ये (Secunderabad Shelter Home) पोहोचला आणि बघता बघता काही वेळातच त्याने अखेरचा श्वास घेतला. लोगेश हा एका ठिकाणी बसला होता आणि अचानकपणे तो पडला. त्यामुळे लगेच डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी लोगेशला मृत घोषित केलं. त्यानंतर लोगेशचा मृतदेह (Lockdown Effect Labor Died) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

लोगेशसोबत सिकंदराबाद येथे पायी येणाऱ्या लोकांच्यामते, ते तीन दिवसांपासून सतत चालत आहेत. रस्त्यात त्यांना कुठलंही साधन न मिळाल्याने त्यांना पायीच हा प्रवास करावा लागला. रस्त्यात त्यांना अनेकांनी जेवण दिलं आणि काही ट्रक चालंकानी थोड्या अंतरापर्यंत त्यांना लिफ्ट दिली. त्यांची मदत करणाऱ्या ट्रक चालकांना पोलिसांनी मारहाण केली.

माहितीनुसार, नागपूर आणि तेलंगाणामध्ये वाढत्या उष्णतेमुळे गेल्या काही दिवसांपासून येथील तापमान 38 डिग्री सेल्सिअस आहे. तर नागपुरातून स्थलांतर करत असलेल्या मजुरांच्या पाठीवर ओझं लादण्यात आलं आहे. लोगेशच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत प्रवास करत असलेल्या लोकांनी स्थानिक नेत्यांची मदत मागितली आहे. त्यांना घरी पोहोचवण्यासाठी गाडीची व्यवस्था करावी अन्यथा ते पायी घरी जातील, (Lockdown Effect Labor Died) असा इशारा या मजुरांनी दिला आहे.

Follow Us
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी