AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला नाही मिळाले बहुमत, तर काय आहे प्लॅन B? अमित शाह यांनी दिले थेट उत्तर

Amit Shah on Majority : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. पण जर बहुमताचा आकडा गाठताना दमछाक झाली तर भाजपकडे प्लॅन बी तयार आहे का? या प्लॅन बी बाबत अमित शाह यांनी काय सांगितले?

भाजपला नाही मिळाले बहुमत, तर काय आहे प्लॅन B? अमित शाह यांनी दिले थेट उत्तर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
| Updated on: May 17, 2024 | 11:55 AM
Share

लोकसभा निवडणुकीत भाजपचा 400 पारचा नारा गाजला आहे. पूर्ण बहुमताची दवंडी भाजपने अगोदरच दिली आहे. पण जर बहुमताचा आकडा गाठताना दमछाक झालीच तर भाजपकडे प्लॅन बी आहे का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत या प्रश्नाला थेट उत्तर दिले आहे. वृत्तसंस्था ANI ने त्यांची ही मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी अनेक मुद्यांवर रोखठोक बाजू मांडली. मतदानाची घसरलेली टक्केवारी आणि त्याच्या परिणामावर पण त्यांनी मत मत मांडले.

अमित शाह यांचे रोखठोक उत्तर काय

‘एएनआय’ ला त्यांनी मुलाखत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येतील, याची खात्री असल्याचे अमित शाह म्हणाले. जर भाजप बहुमत गाठू शकलं नाही तर, त्यांच्याकडे प्लॅन बी तयार आहे का? या प्रश्नाला त्यांनी ‘प्लॅन बी तेव्हाच तयार करतात, जेव्हा प्लन ए यशस्वी होण्याची शक्यता 60 टक्क्यांहून कमी असते.’ असं रोखठोक उत्तर दिलं.

400 जागा हव्यात कशाला?

  • भाजपच्या 400 पार नाऱ्यामुळे काही जण नाराज पण झाले. भाजप मित्रपक्षातील अनेकांनी ही धडकी भरवणारी आणि असुरक्षितता निर्माण करणारी घोषणा असल्याचे भाष्य केले आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी 400 जागा हव्या कशाला, याचे उत्तर दिले. भाजपला 400 जागा हव्या असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या सीमा सुरक्षित करायच्या असतील. मजबूत राष्ट्रासाठी 400 जागा हव्यात, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
  • सर्व भारतीयांना वाटते की देश सुरक्षित राहावा. जगात त्याचा सन्मान वाढावा. हा देश समृद्ध व्हावा. देश आत्मनिर्भर व्हावा. हा देश विकसीत व्हावा. गरीब असो वा श्रीमंत, गेल्या 10 वर्षांत भारताचा जगात मान वाढला आहे, हे प्रत्येकाला माहिती असल्याचे ते म्हणाले.

संविधान, घटना बदलण्यावर दिली ही प्रतिक्रिया

भाजपचे सरकार बहुमताने आल्यास संविधान, घटना बदलणार असा आरोप करण्यात येतो. त्यावर अमित शाह यांनी पलटवार केला. भाजपकडे गेल्या 10 वर्षांपासून बहुमत आहे. पण आम्ही असा प्रयत्न कधी केला नाही. माझ्या पक्षाचा बहुमताच्या दुरुपयोग करण्याचा इतिहास नाही. बहुमताचा दुरुपयोग इंदिरा गांधी यांच्यावेळी काँग्रेसने केला होता, असा हल्लाबोल त्यांनी केला.

केजरीवाल यांना क्लीन चीट नाही

केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला. त्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी मत व्यक्त केले. केजरीवाल यांना ही क्लीनचीट नाही. कोर्टाने केवळ निवडणूक प्रचारासाठी 1 जूनपर्यंत त्यांना सोडले आहे. ते जिथे पण जातील, जनतेला मद्यघोटाळाच आठवेल, असा टोला पण त्यांनी लगावला.

ओडिशात सरकार बदलणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ओडिशा आणि काश्मीरबाबत मोठं भाकित केलं. ओडिशात सरकार बदलणार असा दावा त्यांनी केला. काश्मीरमध्ये पूर्वी निवडणुकांवर बहिष्कार टाकल्या जायचा. आता काश्मीरमध्ये मतदान होते. पहिल्यांदा 40 टक्के काश्मीर पंडितांनी मतदान केल्याचा दावा त्यांनी केला.

Follow Us
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
मोठी बातमी! मनोरंजन विश्व हादरलं; वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं...
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव!
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव; विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत