AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : संघाचे कौतुक सोडा, निवडणूक आयोगावर पुन्हा प्रहार; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप काय?

Rahul Gandhi attack on Election Commission : राज्यात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कौतुकाचा वर्षाव केलेला असला तरी काँग्रेसने संघासह निवडणूक आयोगावर प्रहार केला आहे.

Rahul Gandhi : संघाचे कौतुक सोडा, निवडणूक आयोगावर पुन्हा प्रहार; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप काय?
राहुल गांधी, संघ,
| Updated on: Jan 15, 2025 | 1:58 PM
Share

राज्यात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूक्ष्म नियोजनाची प्रशंसा केली. विधानसभेतील पराभवाचे मंथन करताना या दोन्ही पक्षांनी संघाचे कोडकौतुक केले. पण काँग्रेसने पराभवाचे मंथन करताना संघाची आरती ओवाळली नाही. उलट सरसंघचालक मोहन भागवत आणि निवडणूक आयोगावर तोंडसूख घेतले. काय म्हणाले राहुल गांधी?

निवडणूक आयोगावर प्रहार

महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची आहे. मी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की मतदार यादीमध्ये पारदर्शकता ठेवा. पारदर्शकपणे मतदान होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आम्ही जी माहिती आयोगाकडे मागीतली ती त्यांनी दिली नाही, असा आरोप निवडणूक आयोगाने केला आहे.

सरसंघचालकांवर साधला निशाणा

देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य भारतीयांचा अपमान करणारे असल्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले. इतर एखाद्या देशात त्यांनी असं वक्तव्य केलं असतं तर त्यांना अटक झाली असती, असे गांधी म्हणाले. राम मंदिर तयार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळाले असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. त्यावर गांधी यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

मोहन भागवतांचं वक्तव्य तरी काय?

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी सोमवारी एक वक्तव्य केले होते. अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी व्हावी असे म्हणणे त्यांनी मांडले. कित्येक शतकांपासून आक्रमण सहन करणाऱ्या देशासाठी हेच खरं स्वातंत्र्य असल्याचे ते म्हणाले होते.

त्यावरून राहुल गांधी यांनी हा निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले हे दोन विचारांमधील द्वंद आहे. दोन विचारांमधील ही लढाई आहे. संविधान हा आमचा विचार आहे. तर दुसरीकडे संघाचा विचार हा नेमका त्याच्या उलट आहे. देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य भारतीयांचा अपमान करणारे असल्याचे गांधी म्हणाले.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत