AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : संघाचे कौतुक सोडा, निवडणूक आयोगावर पुन्हा प्रहार; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप काय?

Rahul Gandhi attack on Election Commission : राज्यात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कौतुकाचा वर्षाव केलेला असला तरी काँग्रेसने संघासह निवडणूक आयोगावर प्रहार केला आहे.

Rahul Gandhi : संघाचे कौतुक सोडा, निवडणूक आयोगावर पुन्हा प्रहार; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप काय?
राहुल गांधी, संघ,
| Updated on: Jan 15, 2025 | 1:58 PM
Share

राज्यात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूक्ष्म नियोजनाची प्रशंसा केली. विधानसभेतील पराभवाचे मंथन करताना या दोन्ही पक्षांनी संघाचे कोडकौतुक केले. पण काँग्रेसने पराभवाचे मंथन करताना संघाची आरती ओवाळली नाही. उलट सरसंघचालक मोहन भागवत आणि निवडणूक आयोगावर तोंडसूख घेतले. काय म्हणाले राहुल गांधी?

निवडणूक आयोगावर प्रहार

महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची आहे. मी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की मतदार यादीमध्ये पारदर्शकता ठेवा. पारदर्शकपणे मतदान होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आम्ही जी माहिती आयोगाकडे मागीतली ती त्यांनी दिली नाही, असा आरोप निवडणूक आयोगाने केला आहे.

सरसंघचालकांवर साधला निशाणा

देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य भारतीयांचा अपमान करणारे असल्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले. इतर एखाद्या देशात त्यांनी असं वक्तव्य केलं असतं तर त्यांना अटक झाली असती, असे गांधी म्हणाले. राम मंदिर तयार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळाले असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. त्यावर गांधी यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

मोहन भागवतांचं वक्तव्य तरी काय?

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी सोमवारी एक वक्तव्य केले होते. अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी व्हावी असे म्हणणे त्यांनी मांडले. कित्येक शतकांपासून आक्रमण सहन करणाऱ्या देशासाठी हेच खरं स्वातंत्र्य असल्याचे ते म्हणाले होते.

त्यावरून राहुल गांधी यांनी हा निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले हे दोन विचारांमधील द्वंद आहे. दोन विचारांमधील ही लढाई आहे. संविधान हा आमचा विचार आहे. तर दुसरीकडे संघाचा विचार हा नेमका त्याच्या उलट आहे. देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य भारतीयांचा अपमान करणारे असल्याचे गांधी म्हणाले.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.