AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसनं आधी भाजपवर केली सडकून टीका, नंतर द्यावं लागलं स्पष्टीकरण, नेमकं कोण काय बोललं…

भाजप आणि आरएसएस आणि त्यांच्या नेत्यांच्या फुटीरतावादी विचारसरणीला मी पाच दशकांपासून विरोध करत आलो आहे. माझा राजकीय लढा त्यांच्या राजकारणाविरुद्ध होता, आहे आणि राहील.

काँग्रेसनं आधी भाजपवर केली सडकून टीका, नंतर द्यावं लागलं स्पष्टीकरण, नेमकं कोण काय बोललं...
| Updated on: Apr 27, 2023 | 11:30 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गुरुवारी अडचणीत सापडले. खर्गे यांनी भाजपवर टीका करताच त्यांना भाजपने घेरले असता त्यांना त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. खर्गे यांनी सांगितले की, मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्यांना विष समजा किंवा मानू नका, पण त्याचा स्वाद घेतला तर मृत्यू होईल. त्यामुळे तुम्हाला आता खरचं प्रश्न पडत असेल की हे खरंच विष आहे का? मल्लिकार्जून खर्गे यांच्या त्या विधानावर भाजपने त्यांना घेरले असता त्यावर स्पष्टीकरण देत ते म्हणाले की, मी पंतप्रधान यांच्याबद्दल बोललो नाही. आणि मी वैयक्तिक विधानंही केले नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

काँग्रेसला भाजपने घेरल्यावर मल्लिकार्जून खर्गे यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भाजपची विचारधारा फुटीरतावादी, शत्रुत्वाची, गरीब आणि दलितांबद्दल द्वेषाची असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

त्यावेळी ते म्हणाले की, मी द्वेष आणि द्वेषाच्या राजकारणावर चर्चा केली. माझे विधान पंतप्रधान मोदींसाठी वैयक्तिकरित्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी नव्हते, तर ते ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्यावरून माझ्यावर त्यांनी टीका केली होती.

मल्लिकार्जून खर्गे यांनी आपली बाजू स्पष्ट करताना त्यांनी लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची आमची लढाई ही वैयक्तिक नाही. त्यामुळे ही वैचारिक लढाई आहे.

कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता आणि कळत-नकळत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तो माझा हेतू कधीच नव्हता आणि माझ्या दीर्घ राजकीय जीवनाचा तो माझा भागही नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

खर्गे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी नेहमीच मित्र आणि विरोधकांसाठी राजकीय शुद्धतेचे नियम आणि परंपरांचे पालन केले आहे. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तेच करणार आहे.

मी उच्च पदांवर बसलेल्या लोकांप्रमाणे लोकांची आणि त्यांच्या समस्यांची चेष्टा करत नाही कारण मी गरीब आणि दीनदुबळ्यांच्या व्यथा आणि वेदना पाहिल्या आहेत.

भाजप आणि आरएसएस आणि त्यांच्या नेत्यांच्या फुटीरतावादी विचारसरणीला मी पाच दशकांपासून विरोध करत आलो आहे. माझा राजकीय लढा त्यांच्या राजकारणाविरुद्ध होता, आहे आणि राहील असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.