AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamata Banerjee Marriage: ममता दीदींनी का केले नाही लग्न? कारणही तितकेच मोठे…कधी दूध डेअरीवर करावे लागले काम…

Mamata Banerjee Marriage: ममता बॅनर्जी यांच्या राजकीय जीवनाचा प्रवास अस्ताकडे सुरू झाला आहे की पुढील पाच वर्षात दीदी पुन्हा मोठ्या दमाने भाजपचा सामना करणार याची चर्चा रंगली आहे. पराभवाविषयी टीएमसीत चिंतन सुरू झाले आहे. पण ममता दीदींनी लग्न का केले नाही, यामागील काय आहे कारण?

Mamata Banerjee Marriage: ममता दीदींनी का केले नाही लग्न? कारणही तितकेच मोठे...कधी दूध डेअरीवर करावे लागले काम...
ममचा बॅनर्जीImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 05, 2026 | 11:22 AM
Share

Mamata Banerjee Marriage: पश्चिम बंगालमधील पराभवाने ममता बॅनर्जी यांची देशभरात चर्चा सुरू आहे. त्याचवेळी बॅनर्जी यांनी लग्न का केले नाही, याचीही चर्चा आहे. दीदी यापूर्वी बंगालसारख्या मोठ्या राज्याच्या तीन वेळा मुख्यमंत्री होत्या. टीएमसी सारख्या मोठ्या पक्षाच्या त्या प्रमुख आहेत. खासदार, आमदार, मुख्यमंत्री, देशाच्या रेल्वेमंत्री अशा अनेक भूमिका त्यांनी निभावल्या आहेत. पण त्यांनी लग्न केले नाही. लग्न केल्यास समाजाला आणि जनतेला आपण वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे लग्न नकोच असे त्यांचे ठाम मत होते. अर्थात उत्तराधिकारी म्हणून त्यांनी पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांचीच निवड केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी का केले नाही लग्न?

ममता बॅनर्जी यांचे साधे राहणीमान लोकप्रिय आहे. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच सामाजिक आंदोलनापासून झाली. समाजसेवा आणि राजकारण हेच त्यांचे ध्येय होते. अशावेळी कुटुंबाला आपण वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे त्यांनी लग्न केले नाही. राज्य, महिला आणि पक्ष वाढीसाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले. त्यांनी राजकीय जबाबदाऱ्यांना अधिक महत्त्व दिले. त्यांची जीवनशैली अत्यंत साधी आहे.

ममता बॅनर्जी यांचा जन्म कुठे झाला?

ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 रोजी कोलकत्ता येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण कोलकत्त्यातून पूर्ण केले. त्यांनी कोलकत्ता विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी मिळवली. तर इस्लामिक इतिहासात पदवीत्त्युर पदवी मिळवली. त्यांनी पुढे शिक्षण शास्त्र आणि कायद्याचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थी आंदोलनात उडी घेतली.

दूध डेअरीवर केले काम

ममता बॅनर्जीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अत्यंत कठीण झाले. तेव्हा घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली. तेव्हा उदरनिर्वाह आणि भावांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी त्यांना दूध डेअरीवर काम करावे लागले. या संघर्षातून त्यांचे कडवेपण लक्षात येते. त्यातून किशोरवयीन अवस्थेत त्यांचे मन पोळले गेले.

काँग्रेसमधून राजकारणाचे धडे नंतर तयार केला पक्ष

ममता बॅनर्जी यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. 1984 मध्ये पहिल्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आणि सर्वात तरुण वयाच्या खासदार झाल्या. त्यानंतर त्या सतत राजकारणात सक्रिय राहिल्या. त्यानंतर काँग्रेसशी मतभेद झाले. त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. 2011 मध्ये त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. पश्चिम बंगालमधील 34 वर्षांची डाव्याची सत्ता उलथवली. त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री ठरल्या.

Follow Us
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना
तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा...
Harshwardhan Sapkal | तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा पवारांवर पुन्हा हल्लाबोल
ओमराजे, सचिन अहिर थेट लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला; इतर खासदार...
ओमराजे, सचिन अहिर थेट लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला; इतर खासदार... दिल्लीत खरंच काही तरी घडतंय?