AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोरबी दुर्घटनेवरुन ममतादिदीही मैदानात, तपास एजन्सींच्या कारभारावरच ठेवलं बोट

मोरबी ही राजकारण करण्याची गोष्ट नाही मात्र या दुर्घटनेची न्यायिक समितीद्वारे चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत ममता बॅनर्जींनी व्यक्त केले आहे.

मोरबी दुर्घटनेवरुन ममतादिदीही मैदानात, तपास एजन्सींच्या कारभारावरच ठेवलं बोट
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 02, 2022 | 5:01 PM
Share

नवी दिल्लीः गुजरातमधील मोरबी पुलाची दुर्घटना घडल्यानंतर आता देशातील राजकारण प्रचंड तापले आहे. जुलता पूल कोसळल्यानंतर त्यामध्ये 130 लोकांचा जीव गेल्याने आणि अनेक जण बेपत्ता असल्याने गुजरात सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यामध्ये आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही उडी घेतली आहे. मोरबी दुर्घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांनावरही भडकल्या आहेत.

यावेळी त्या म्हणाल्या की, या दुर्घटनेत 135 लोकांचा जीव गेला आहे, त्यामुळे साऱ्या देशाला या घटनेचे दुःख झाले आहे.

या दुर्घटनेबद्दल मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, मोरबी दुर्घटनेवर राजकारण करता येणार नाही. पण राजकारणापेक्षा लोकांचा जीव मौल्यवान असल्याचे सांगितले.

ही दुर्घटना घडून गेली असली तरी या प्रकरणी सरकारला उत्तर हे द्यावेच लागणार आहे. त्यामुळे मोरबी दुर्घटनेची चौकशी होणे गरजेचे असून सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्यायिक समितीद्वारे या घटनेचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

लोकांचा जीव महत्वाचा असल्यानेच मी त्यांच्याविषयी दुःख व्यक्त करत आहे. या दुर्घटनेत काही लोकांचा जीव गेला आहे तर काही लोकं अजूनही बेपत्ता आहेत. त्यामुळे या घटनेची न्यायिक समितीद्वारे तपास करण्याची मी मागणी करत  आहे असंही त्या म्हणाल्या.

मोरबी दुर्घटनेविषयी बोलताना त्यांनी ईडी आणि सीबीआयवरही जोरदार टीका केली आहे. या तपास यंत्रणांवर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, गुजरातमधील मोरबी दुर्घटन घडल्यानंतर त्याला जबाबदार असणाऱ्या लोकांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी का केली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मोरबीमधील हा जुलता पूल शंभर वर्षापेक्षा खूप जुना होता. ज्या वेळी या पुलावर दुर्घटना घडली त्यावेळी 135 लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला होता. तर अनेक लोकं बेपत्ता झाली आहेत.

तर काहीजण गंभीर जखमी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एवढी मोठी दुर्घटना घडूनही या प्रकरणी फक्त 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी गंभीर तपास होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड